शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवरील हल्ल्यावरून लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:49 IST

काश्मीरमधे दगडफेक करणाºयांना आताचे सत्तधारी दहशतवादी म्हणतात. मग गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांना काय म्हणणार? असा रोखठोक सवाल गृहमंत्र्यांना करीत मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी लोकसभेत गरजले की, काँग्रेसजन अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरत नाहीत.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : काश्मीरमधे दगडफेक करणाºयांना आताचे सत्तधारी दहशतवादी म्हणतात. मग गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांना काय म्हणणार? असा रोखठोक सवाल गृहमंत्र्यांना करीत मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी लोकसभेत गरजले की, काँग्रेसजन अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरत नाहीत कारण गांधींजीच्या अहिंसेच्या मार्गावर आमचा विश्वास आहे तर भाजपचा अधिक भरवसा घृणा आणि हिंसेवर आहे.खरगेंना उत्तर देताना गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, राहुल गांधी देशासाठी अनमोल आहेत. दगडफेक कोणावरही असो, अशा घटना निषेधार्हच आहेत. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही. या प्रकरणात गुजरात सरकारने योग्य कारवाई लगेच केली आहे. तथापि राहुल गांधी ६ वेळा ७२ दिवसांसाठी परदेशात एसपीजी सुरक्षा व्यवस्था नाकारून कशासाठी गेले? गुजरातमधे बुलेटप्रुफ गाडीऐवजी राहुल साध्या गाडीत का बसले? देशाला याचे उत्तर हवे आहे. संसदीय व्यवस्थेने प्रदान केलेली सुरक्षा धुडकावणे हे कायद्याचे उल्लंघन नाही काय? असा प्रतिप्रश्न राजनाथसिंगांनी केला.राहुल गांधींच्या गाडीवरील दगडफेकीवरून मंगळवारी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीत तृणमूलचे सदस्यही सहभागी झाले. या गदारोळात लोकसभेचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.खरगे म्हणाले की, राहुल गांधी पूरग्रस्तांना भेटायला गुजरातमध्ये गेले होते. तिथे २७0 पूरग्रस्त मरण पावले. या दौºयात राहुलच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गाडीच्या मागच्या भागावर जो दगड फेकला गेला तो पुढच्या सीटवर फेकला असता तर राहुल यांच्या जीवाला धोका झाला असता. गांधी कुटुंबातल्या दोन नेत्यांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. देशासाठी शहीद झालेल्या दिवंगत पंतप्रधानांचे राहुल हे पुत्र आहेत.खरगेंच्या भडिमाराला दुजोरा देत तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की, राहुल गांधींवरील हल्ला अतिशय निषेधार्ह, संसदेची अप्रतिष्ठा करणारा व असहिष्णुतेचे प्रदर्शन घडवणारा आहे. सभागृहाने या घटनेचा एकमताने निषेध करायला हवा आणि भविष्यात राहुलना पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्यायला हवी.एसपीजी सुरक्षा घेण्याचे टाळणे हे कायदाचे उल्लंघन आहेया घटनेवर गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले की देशातत राहुल गांधींनी १२१ दौरे केले. त्यापैकी १00 वेळा जाणीवपूर्वक त्यांनी एसपीजी सुरक्षा घेण्याचे टाळले. हे कायदाचे उल्लंघन आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था न घेताच ते सहा वेळा परदेशात गेले. या दौऱ्यांमधे राहुल गांधी नेमके काय लपवू इच्छितात, साºया देशाला याची उत्सुकता आहे. अतिविशिष्ठ व्यक्तींना एसपीजी सुरक्षा कायद्याने दिली जाते.सुप्रीम कोर्टाचे याबाबत काही स्पष्ट निर्देश आहेत. गुजरात सरकारने राहुल गांधींना सुरक्षा व्यवस्था देऊ केली होती. मात्र, बुलेटप्रुफ गाडीत न बसता राहुल गांधींनी आपल्या सचिवाच्या सल्ल्यानुसार बुलेटप्रुफ नसलेल्या गाडीत बसणे पसंत केले. पूर्वनियोजित नसलेल्या अनेक ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी ते वारंवार गाडीतून उतरले. काँग्रेसने या दोन्ही घटनांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.