शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरवादी आलमच्या सुटकेत काही गैर नाही

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

जम्मू-काश्मीर: मेहबुबा मुफ्ती यांचा युक्तिवाद

जम्मू-काश्मीर: मेहबुबा मुफ्ती यांचा युक्तिवाद
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेत काहीही गैर नाही. त्याने कधी बंदूक हाती घेतली नाही. तो इ.स.२०१० सालच्या हिंसक दगडफेक आंदोलनाची निर्मिती आहे. या आंदोलनाचे नेतृत्व त्याने केले होते, असा युक्तिवाद राज्यातील सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी)अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे केला.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आलमची सुटका करून केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात आलमच्या सुटकेवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या असंतोषात आपलेही स्वर मिसळीत ही सुटका अमान्य असल्याचे म्हटले होते. राज्यातील सत्ताधारी पीडीपी आणि भाजपा युतीतही यामुळे तणाव निर्माण झाला होता.
इंडिया टुडेच्या परिसंवादात मेहबुबा मुफ्ती यांनी आपली उपरोक्त भूमिका मांडली. आलमची सुटका करणे ही एक चूक होती काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांचे उत्तर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही जर चूक मानली जात असेल तर आम्ही काय करू शकतो? काश्मीरचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही तुमच्याच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही असे कसे करू शकता? असा उलट सवाल मेहबुबा यांनी उपस्थित केला. एखादा नवा आधार असेल तरच आलमला पुन्हा ताब्यात घेता येईल, या न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ यामागे होता.
न्यायालयाच्या निर्णयाबाबत दुहेरी मापदंड अवलंबले जाऊ नयेत अशी इच्छा व्यक्त करताना त्या म्हणाल्या, तुम्ही यादीतील २८ वा क्रमांक उचलून अफजल गुरूला फासावर लटकविता आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे सांगता. परंतु हेच सर्वोच्च न्यायालय आलमची सुटका करा, त्याला कुठल्याही आरोपाशिवाय बंदिस्त ठेवण्यात आले आहे असे सांगते तेव्हा मात्र तुम्ही त्यावर प्रश्न उपस्थित करता.

कोट
मसरत आलमची सुटका झाली तेव्हा लोकांनी सर्वोच्च न्यायालय या निर्णयाप्रत कसे पोहोचले यावर चर्चा करायला हवी होती. देशातील सुरक्षेबाबत दृष्टिकोनाच्या एकदम विपरीत निर्णय कसा आला याचा विचार होणे अपेक्षित होते. मसरत आलमलाही हे उमगले नसेल. परंतु मला याची खात्री आहे की जेव्हा तो अंतर्मनातून याचा विचार करेल तेव्हा त्याला हे कळेल. अथवा त्याच्या सभोवतालचे लोक निश्चितच हे म्हणत असतील की हेच भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. मेहबुबा मुफ्ती, अध्यक्ष ,पीडीपी, जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर सरकार अस्थिर करण्याचा कट
उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांचा आरोप
जम्मू: प्रशासनातील काही लोक पीडीपी-भाजपा सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी शनिवारी केला. हे कटकारस्थान रचणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की राज्याच्या ध्वजासंदर्भात सरकारला अस्थिर करण्याचा एक मोठा प्रयत्न झाला. आम्ही सरकारअंतर्गत या मुद्यावर चर्चा केली तेव्हा हे स्पष्ट झाले.