शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

शेतक-याच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 23, 2015 15:25 IST

शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३ - शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. दिल्लीत काल घडलेल्या
घटनेमुळे आपण अतिशय दु:खी झालो असेही ते म्हणाले. 
दिल्लीत किसान रॅलीदरम्यान सर्वांदेखत झाडाला गळफास लावून आत्महत्या करणा-या गजेंद्र सिंग या शेतक-याच्या मृत्यमुळे संपूर्ण देश हादरला. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत या वि,यावर चर्चा करण्यात आली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी निवेदन दिल्यावर पंतप्रधानांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतक-यांच्याा आत्महत्या ही खूप जुनी व व्यापक समस्या असून देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. प्रत्येक सरकारने त्यांच्या काळात ही समस्या सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. भूतकाळात आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे तपासून पाहण्याची गरज असून या समस्येवर योग्य उपाययोजना शोधण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 
विरोधकांचा संसदेत गोंधळ
गजेंद्र सिंगच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री व पंतप्रधानांनी निवेदन द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत  गदारोळ माजवल्यामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.  गजेंद्र जेव्हा आत्महत्या करत होता तेव्हा पोलिस काय करत होते, त्यांनी त्याला रोखण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाही असा सवाल काँग्रेसचे गट नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. गजेंद्रच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
 
शेतकरी आत्महत्येवरून राजकारण नको - राजनाथ सिंग
कालची घटना अतिशय गंभीर व दुर्दैवी असून कोणत्याही पक्षाने या मुद्यावरून राजकारण करू नये असे  गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. गजेंद्र सिंग आत्महत्या करण्यासाठी जेव्हा झाडावर चढला तेव्हा आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवत त्याला उकसवत होते. मात्र पोलिसांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करत गजेंद्रला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र अखेर ते अपयशी ठरले, असे सिंग म्हणाले. याप्रकरणी संसदमार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.