शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

स्टार्टअप्सच्या दुखण्यावर उतारा नाही!

By admin | Updated: February 1, 2017 19:36 IST

स्टार्टअप्सना ७ वर्षे कर सवलत देण्याच्या आणि या नवउद्योगांना नुकसान झालेच तर ते १५ वर्षे कॅरीफॉरवर्ड करण्याच्या निर्णयाचें स्वागत करायला हवे

-मंदार भारदे (व्यवस्थापकीय संचालक, मॅब एव्हिएशन)

मुंबई, दि. 1 - स्टार्टअप्सना ७ वर्षे कर सवलत देण्याच्या आणि या नवउद्योगांना नुकसान झालेच तर ते १५ वर्षे कॅरीफॉरवर्ड करण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. त्यातून नव उद्योगांना बळ मिळेल असें अर्थमत्र्यांना वाटत असेलही. मात्र, त्यापलिकडे नवउद्योगांचे काही प्रश्न आहेत, ज्याबाबत या अर्थसंकल्पात काहीही ठोस विचार केलेला दिसत नाही. त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुणाही तरुणाला उद्योजक बनण्याची इच्छा असेल तरी भांडवल कोण देणार? मोठे भांडवल मिळण्याची काहीही सोय किंवा तरतूद या अर्थसंकल्पाने केलेली नाही. मुद्रा बॅँक असली तरी त्यातून केवळ दहा लाख रुपये भांडवल मिळते. त्यातून अगदी छोटे उद्योग उभे राहू शकतात. मात्र ज्यांच्याकडे मोठी संकल्पना आहे, त्यातून मोठा उद्योग सुरु करण्याची इच्छा आहे त्यांना इतक्या कमी भांडवलाचाही काहीही उपयोग नाही. नवउद्योगांना ताकद द्यायची तर भांडवलाची सोय कोण करणार हा प्रश्न या अर्थसंकल्पात अनुत्तरीतच राहतो. त्यानंतरचा प्रश्न आहे तो बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी प्रत्यक्ष करांत काही सवलत देण्याचा. त्याने उत्पादन किंमत कमी होवू शकली असती आणि नव उद्योगांना पाठिंबा म्हणून ते मोठे योगदान ठरले असते, पण तसेंही या अर्थसंकल्पानें काही केलेले नाही. त्यामुळे नवउद्योगांना अपेक्षित बळ मिळू शकलेले नाही.आणि नवउद्योगांसाठीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो बौद्धिक संपदेचा. वारंवार हे दिसते, की नवउद्योजक या बौद्धिक संपदा हक्कांच्या संदर्भात त्रासतात. जो उद्योगांना भांडवल देतो त्याच्याकडे त्या कल्पनचा स्वामित्व हक्क ( पेटंट) जातो. किंवा मग भांडवल उभारणीसाठी म्हणून हे उद्योजक पेटंटचे हक्क देऊन टाकतात. त्या हक्कांसाठी काही ठोस तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती. त्याचा विचार केला गेलेला नाही.