शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लष्कराला 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही - फरहान अख्तर

By admin | Updated: October 29, 2016 15:00 IST

'रईस' सिनेमाचा सहनिर्माता फरहान अख्तरने भारतीय लष्कराला पाच कोटी रुपये देण्यास नाकारले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - 'ए दिल है मुश्किल'वरुन तापलेले वातावरण शांत झालेले असताना आता 'रईस'वरुन नव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. 'रईस' सिनेमाचा सहनिर्माता फरहान अख्तरने लष्कराला पाच कोटी रुपये देण्यास नाकारले आहे. 'लष्कराने स्वतः पाच कोटी रुपये घेण्यासाठी नाकारल्याने त्यांना ती रक्कम देण्याचा प्रश्नच येत नाही', असे विधान फरहानने केले आहे. त्यामुळे यावरुन पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसंदर्भातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. 
 
'रईस' सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आहे, त्यामुळे फरहानच्या या वक्तव्यावरुन शमलेला वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे लष्कराच्या भूमिकेचे फरहानने कौतुक केले आहे, मात्र दुसरीकडे लष्कराला पाच कोटी रुपये न देण्यावर स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले आहे की, 'आम्ही कर भरतो त्यामुळे सुरक्षा पुरवण्याची सरकारची जबाबदारी आहे'. यावर, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ज्यावेळी जवळ येईल तेव्हा याकडे लक्ष देऊ, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. 
 
आणखी बातम्या
'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे मनसेने तीव्र विरोध करत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिनेनिर्माता असोसिएशनमध्ये बैठक झाली.  या बैठकीत पाकिस्तानी कलाकारांसोबत भविष्यात काम करणार नाही, तसंच ज्या आगामी सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत, त्यांच्या निर्मात्यांनी आर्मी फंडसाठी  5 कोटी रुपये द्यावेत, या मनसेच्या अटी सिनेनिर्माता असोसिएशनने मान्य केल्यानंतर 'ए दिल...' मुश्किल टळली होती.