शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

मतदान यंत्रांमध्ये बिघाड झालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:10 IST

देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड

नवी दिल्ली : देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीच मुख्य निवडणूक आयु्क्तांनी फेटाळून लावल्या आहेत.मतदानावेळी अनेक मतदान यंत्रे सुरू नव्हती, काही ठिकाणी ती बिघडली, काही ठिकाणी ज्याला मत द्यायचे ते बटनच दाबले जात नव्हते, अशा असंख्य तक्रारी पालघर, गोंदिया-भंडारा तसेच उत्तर प्रदेशातील कैराना येथून आल्या. या तिन्ही ठिकाणी त्यामुळे काही मतदारांना घरी परतावे लागले, ते यंत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानासाठी परतले नाहीत. परिणामी तिथे मतदान कमी झाले.याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल, बहुजन विकास आघाडी, भारिप-बहुजन महासंघ यांच्या नेत्यांनी लगेचच राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. उन्हामुळे काही यंत्रांत बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनीही मान्य केले होते. पण मतदान यंत्रांमध्ये कुठेही बिघाड नव्हता मात्र पहिल्यांदाचव वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट (मतदानानंतर मिळणारी चिठ्ठी)विषयी तक्रारी होत्या, असा दावा आयुक्त ओ. पी. रावत यांनी केला. सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आज उन्हाळ्यामुळे यंत्रांत बिघाड झाला असे अधिकारी सांगतात उद्या पावसामुळे वा थंडीमुळे बिघाड झाला, असेही सांगतील.पुढील वर्षी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यातच होणार आहेत. तेव्हा असे प्रकार घडले, तर साराच गोंधळ होईल. त्यामुळे मतपत्रिकांचाच वापर यापुढील निवडणुकांमध्ये करण्यात यावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, रालोद, राजद अशा सर्वच विरोधी पक्षांनी मतदानासाठी मतदानपत्रिकाच असाव्यात, अशी मागणी केली आहे.