शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मतदान यंत्रांमध्ये बिघाड झालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:10 IST

देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड

नवी दिल्ली : देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीच मुख्य निवडणूक आयु्क्तांनी फेटाळून लावल्या आहेत.मतदानावेळी अनेक मतदान यंत्रे सुरू नव्हती, काही ठिकाणी ती बिघडली, काही ठिकाणी ज्याला मत द्यायचे ते बटनच दाबले जात नव्हते, अशा असंख्य तक्रारी पालघर, गोंदिया-भंडारा तसेच उत्तर प्रदेशातील कैराना येथून आल्या. या तिन्ही ठिकाणी त्यामुळे काही मतदारांना घरी परतावे लागले, ते यंत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानासाठी परतले नाहीत. परिणामी तिथे मतदान कमी झाले.याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल, बहुजन विकास आघाडी, भारिप-बहुजन महासंघ यांच्या नेत्यांनी लगेचच राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. उन्हामुळे काही यंत्रांत बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनीही मान्य केले होते. पण मतदान यंत्रांमध्ये कुठेही बिघाड नव्हता मात्र पहिल्यांदाचव वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट (मतदानानंतर मिळणारी चिठ्ठी)विषयी तक्रारी होत्या, असा दावा आयुक्त ओ. पी. रावत यांनी केला. सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आज उन्हाळ्यामुळे यंत्रांत बिघाड झाला असे अधिकारी सांगतात उद्या पावसामुळे वा थंडीमुळे बिघाड झाला, असेही सांगतील.पुढील वर्षी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यातच होणार आहेत. तेव्हा असे प्रकार घडले, तर साराच गोंधळ होईल. त्यामुळे मतपत्रिकांचाच वापर यापुढील निवडणुकांमध्ये करण्यात यावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, रालोद, राजद अशा सर्वच विरोधी पक्षांनी मतदानासाठी मतदानपत्रिकाच असाव्यात, अशी मागणी केली आहे.