शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

मतदान यंत्रांमध्ये बिघाड झालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:10 IST

देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड

नवी दिल्ली : देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीच मुख्य निवडणूक आयु्क्तांनी फेटाळून लावल्या आहेत.मतदानावेळी अनेक मतदान यंत्रे सुरू नव्हती, काही ठिकाणी ती बिघडली, काही ठिकाणी ज्याला मत द्यायचे ते बटनच दाबले जात नव्हते, अशा असंख्य तक्रारी पालघर, गोंदिया-भंडारा तसेच उत्तर प्रदेशातील कैराना येथून आल्या. या तिन्ही ठिकाणी त्यामुळे काही मतदारांना घरी परतावे लागले, ते यंत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानासाठी परतले नाहीत. परिणामी तिथे मतदान कमी झाले.याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल, बहुजन विकास आघाडी, भारिप-बहुजन महासंघ यांच्या नेत्यांनी लगेचच राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. उन्हामुळे काही यंत्रांत बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनीही मान्य केले होते. पण मतदान यंत्रांमध्ये कुठेही बिघाड नव्हता मात्र पहिल्यांदाचव वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट (मतदानानंतर मिळणारी चिठ्ठी)विषयी तक्रारी होत्या, असा दावा आयुक्त ओ. पी. रावत यांनी केला. सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आज उन्हाळ्यामुळे यंत्रांत बिघाड झाला असे अधिकारी सांगतात उद्या पावसामुळे वा थंडीमुळे बिघाड झाला, असेही सांगतील.पुढील वर्षी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यातच होणार आहेत. तेव्हा असे प्रकार घडले, तर साराच गोंधळ होईल. त्यामुळे मतपत्रिकांचाच वापर यापुढील निवडणुकांमध्ये करण्यात यावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, रालोद, राजद अशा सर्वच विरोधी पक्षांनी मतदानासाठी मतदानपत्रिकाच असाव्यात, अशी मागणी केली आहे.