शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याची योजना नाही!

By admin | Updated: May 4, 2016 03:12 IST

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. तसेच वाहन पंजीयन प्रमाणपत्राच्या वैधतेत काही बदल करण्याचाही सरकारचा इरादा नाही, असे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग

- प्रमोद गवळी ल्ल नवी दिल्ली

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. तसेच वाहन पंजीयन प्रमाणपत्राच्या वैधतेत काही बदल करण्याचाही सरकारचा इरादा नाही, असे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४१ (७) अन्वये बिगर-परिवहन वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र १५ वर्षांसाठी वैध असते. वाहनाच्या फिटनेसमध्ये काही दोष नसतील तर प्रमाणपत्राची मुदत आणखी पाच वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते.नॅशनल परमिटचे नियम१२ वर्षांपेक्षा जास्त जुन्या एक्सेलरहित मालमोटारीला राष्ट्रीय परमिट दिले जाणार नाही, अशी परिवहन वाहनांसाठी असलेल्या केंद्रीय मोटार वाहन नियमावली- १९८९ मधील कलम ८८ च्या उपनियम १ ते ४ मध्ये तरतूद केली आहे. तसेच मल्टी एक्सल असलेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या मालमोटारीलाही परमिट दिले जाणार नाही. ५० टनापेक्षा जास्त वजनाचा माल वाहून नेणाऱ्या २५ वर्षे जुन्या वाहनांनाही परमिट देता येत नाही.आकार आणि बनावटमोटार वाहनांना कारखान्यामधून देशाच्या विविध विक्री आऊटलेटपर्यंत नेण्यासाठी आॅटोमोबाईल निर्मात्यांद्वारे तैनात करण्यात आलेल्या ट्रेलर वाहनांचा आकार आणि बनावट प्रमाणित करताना केंद्र सरकारने त्याबाबत १८ एप्रिल २०१६ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली.दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी आणि समितीची स्थापनाखा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी म्हणाले, ३१ मार्च रोजी झालेल्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यानंतर १ एप्रिल रोजी श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. पोलीस आणि प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्ववत झाली. परंतु ५ एप्रिल रोजी स्थानिक विद्यार्थ्यांनी पुन्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात संघर्ष उडाला. पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यात सात विद्यार्थी जखमी झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने दंडधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे आणि प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि तथ्य शोधण्यासाठी एक समितीही नियुक्त केली आहे.