शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नोटा छापण्याशिवाय अन्य पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:31 IST

पण सर्व काही बंद राहिले तर कोरोनापेक्षा अधिक लोक उपाशीपोटी राहिल्याने मृत्युमुखी पडतील.

- जयेंद्र भाई शाहप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक विशेषज्ञ जयेंद्र भाई शाह यांचे मत अतिशय स्पष्ट आहे की, सरकारने नोटा तर छापाव्यातच; पण हेही निश्चित करावे की, सामान्य माणसापासून ते उद्योजकांपर्यंत हा पैसा पोहोचावा. ते म्हणतात की, लॉकडाऊन पूर्णपणे हटवायला हवे. निश्चितच कोरोनाचे रुग्ण वाढतील; पण सर्व काही बंद राहिले तर कोरोनापेक्षा अधिक लोक उपाशीपोटी राहिल्याने मृत्युमुखी पडतील.विकास मिश्र / नागपूर ।लोकमत न्यूज नेटवर्कप्रश्न : व्यापार-व्यवसायाचे भविष्य कसे दिसते? बाजारपेठेला आधीसारखी चमक येईल?शाह : भारतात किरकोळ व्यापाराचे फार महत्त्व आहे. किरकोळ व्यापारात फार लोक गुंतलेले आहेत. त्यातून अनेकांना तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देतो. गेल्या पाच महिन्यांत काय झाले हे बघा. बाजार बंद असल्यामुळे लोक दुकानांवर जाऊ शकले नाहीत. बऱ्याच लोकांनी आॅनलाईन व्यवहाराचा मार्ग निवडला. लोकसंख्येचा विचार करता तो कमी असू शकेल; परंतु हा बदल महत्त्वाचा आहे. बºयाच लोकांनी वर्क फ्रॉम होम कल्चर आत्मसात केली आहे. याकडे तुम्ही लक्ष द्या. ही कल्चर जशी वाढेल तसे लोक बाजारात कमीच जाऊ शकतील व त्यामुळे आॅनलाईनला जास्त लोक पसंती देत आहेत. मला वाटते की, आॅनलाईनमध्ये वाढ होईल आणि लॉजिस्टिक, गोदामे, डिलिव्हरी क्षेत्रात रोजगारनिर्मिती तर होईल; परंतु जे लोक फिजिकल रिटेलमध्ये काम करीत आहेत त्यातील बरेचसे लोक रोजगार गमावतील किंवा त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल.प्रश्न : या परिस्थितीत आम्ही स्थायीरीत्या वर्क फ्रॉम होमकडे जात आहोत का?शाह : कोरोना महामारीच्या आधी बहुतकरून क्षेत्रांत काम करणाºयाची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असायची; परंतु महामारीने आपल्याला हे शिकवले की, अशी अनेक कामे आहेत की, त्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थितीची गरज नाही. जे लोक या प्रकारे काम करीत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच वर्क फ्रॉम होम कल्चर वाढेल व त्यामुळे सगळ्यांची सोयही होईल.प्रश्न : मग काय करता येईल?शाह : सध्या आपण काही करू शकत नाही. ही वेळ निघून जाऊ द्या. कारखान्यांत गेल्या मार्चमध्ये जेवढे मजूर होते तेवढे ते आता त्यांना मिळत नाहीत. नोकºया आहेत; परंतु त्या जागा भरल्या जात नाहीत. कारण मजूर घरी गेले आहेत. आज ते परतत नाहीत. कारण त्यांना सरकारी साह्य मिळत आहे. जेव्हा हे साह्य संपून जाईल तेव्हा ते परत येतील. तेव्हा त्यांना नोकरी मिळेल? मला अशा कंपन्या माहीत आहेत की, ज्यांना लोक मिळत नाहीत; परंतु कमी मजुरांतही ते उत्पादन वाढवण्यात व्यस्त आहेत. जर कमी मजुरांना कामाची कला अवगत झाली तर स्थायी रोजगारांचे नुकसान होईल. जेव्हा मजूर परततील तर कदाचित त्या सगळ्यांना रोजगार मिळणारही नाही.प्रश्न : जर सरकारने आणखी चलनी नोटा छापून त्या बाजारात आणल्या, तर चलनवाढ होईल. फायदा काय होणार?शाह : चलनात नव्याने नोटा आल्या, तर चलनवाढ होणारच; परंतु सरकारने नोटा नाही छापल्या तर प्रदीर्घ काळाची मंदी येऊ शकते. वेळच अशी आहे की, सरकारने नोटा छापाव्यात आणि हे सुनिश्चित करावे की, सामान्य माणसापासून ते उद्योगपतींपर्यंत तो पैसा पोहोचावा. हे तर स्पष्ट आहे की, तुम्ही चलनात पैसा टाकणार, तर चलनवाढ वाढेल; पण हा असा प्रश्न आहे, तो नंतरही सोडवला जाऊ शकतो. उदा.- जर तुम्ही चार दिवस जेवण केले नाही व दहा दिवसांनंतर पौष्टिक अन्न खाल्ले, तर त्याचा उपयोग काय? तुम्हाला आज जेवण पाहिजे. मग ते जंक फूडदेखील चालेल. जर तुम्हाला जिवंत राहायचे असेल, तर आज मिळणारे जंक फूडही खावे लागेल. जेव्हा तुमच्या हातात पर्याय असेल तेव्हा आरोग्यदायी अन्नाला प्राधान्य द्यावे. यावर्षी कर संकलन आणि ग्राहक वस्तूंची मागणी कमी असेल. या स्थितीत सरकारला नोटा छापणे आणि खर्च करण्यावर लक्ष द्यावे लागेल. जेव्हा अर्थव्यवस्था सुरळीत होईल तेव्हा चलनवाढ नियंत्रणात ठेवावी. आज तिच्यावर नियंत्रण ठेवाल, तर मोठ्या संकटात अडकाल.प्रश्न : असे समजा की, येत्या तीन-चार महिन्यांत कोरोना लस उपलब्ध झाल्यास बाजारावर कोणता परिणाम होईल?शाह : समजा लस उपलब्ध होऊन वेगाने लसीकरणही सुरू झाले; परंतु प्रश्न असा की, त्यासाठी किती वर्षे लागतील? येथे तर जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा सुरू आहे. आयात-निर्यात अनिवार्य आहे. जर भारतात लसीकरण झाले व जगात नाही झाले किंवा जगात झाले; पण भारतात झाले नाही, तर काय होईल? माझे मत असे की, याचा काही परिणाम होईल; पण पूर्ण नाही.प्रश्न : बाजार, व्यवसाय, रेल्वे, बसगाड्या सुरू कराव्यात की बंद ठेवाव्यात? तुम्हाला काय वाटते?शाह : किती दीर्घ काळ तुम्ही या सेवा बंद ठेवाल? त्या सुरू केल्या नाहीत, तर व्यवसाय कसा होईल? मध्यमवर्ग किती दिवस घरी बसून खाणार? सरकार किती दिवस अनुदान देणार? जेव्हा उपासमार होते, तेव्हा कोणताही विचार नसतो. आता सरकारने सगळे काही खुले केले पाहिजे. कोविडचे रुग्ण निश्चितच वाढतील. मला तर असे वाटते की, जर कोविडने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती दु:खद बाब; पण जेव्हा सगळे काही बंद असेल तेव्हा १० लोक उपासमारीने मरतील, तेव्हा सरकार काय करील? सामान्य माणसाचे हित यातच आहे की, बाजारपेठ पूर्णपणे सुरू केली पाहिजे.मुलाखतीचा दुसरा भाग उद्याच्या अंकात