शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाकिस्तानशी काहीही संबंध ठेवण्याची गरज नाही - गौतम गंभीर

By admin | Updated: October 18, 2016 18:02 IST

जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये असं परखड मत भारतीय फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत - पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चित्रपटांवर टाकण्यात आलेली बंदी हा चर्चेचा विषय असून पाकिस्तानसोबत भारताने संबंध ठेवावेत की नाही यावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीरनेही या मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करत 'जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये,' असं म्हटलं आहे. 'सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसोबत आपण उभं राहण्याची गरज असल्याचंही,' गौतम गंभीर बोलला आहे.
 
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. 'जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत असं मला वाटतं. ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्याठिकाणी उभं राहून त्यांनी स्वत: ला पाहण्याची गरज आहे. क्रिकेट असो वा बॉलिवूड पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नयेत,' असं गौतम गंभीर बोलला आहे.
 
'हो मी एका एसी रुममध्ये बसून हे बोलू शकतो की क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका, बॉलिवूडचं राजकारण करु नका, पण तुम्ही जर शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना विचारलत तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या लोकांची सुरक्षा करत नाही, इतर गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. दहशतवाद संपत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं नातं ठेऊ नये या मतावर मी ठाम आहे,' असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.