शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी काहीही संबंध ठेवण्याची गरज नाही - गौतम गंभीर

By admin | Updated: October 18, 2016 18:02 IST

जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये असं परखड मत भारतीय फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत - पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चित्रपटांवर टाकण्यात आलेली बंदी हा चर्चेचा विषय असून पाकिस्तानसोबत भारताने संबंध ठेवावेत की नाही यावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीरनेही या मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करत 'जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये,' असं म्हटलं आहे. 'सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसोबत आपण उभं राहण्याची गरज असल्याचंही,' गौतम गंभीर बोलला आहे.
 
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. 'जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत असं मला वाटतं. ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्याठिकाणी उभं राहून त्यांनी स्वत: ला पाहण्याची गरज आहे. क्रिकेट असो वा बॉलिवूड पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नयेत,' असं गौतम गंभीर बोलला आहे.
 
'हो मी एका एसी रुममध्ये बसून हे बोलू शकतो की क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका, बॉलिवूडचं राजकारण करु नका, पण तुम्ही जर शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना विचारलत तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या लोकांची सुरक्षा करत नाही, इतर गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. दहशतवाद संपत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं नातं ठेऊ नये या मतावर मी ठाम आहे,' असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.