शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही "डाग" नाही, अमेरिकेत मोदींचा "हुंकार"

By admin | Updated: June 26, 2017 07:41 IST

अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षात आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग...

ऑनलाइन लोकमत

व्हर्जिनिया, दि. 26 - अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षात आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही "डाग" लागला नसल्याचं म्हटलं आहे. बहुचर्चित अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोदींनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही "डाग" लागला नसल्याचं ठासून सांगितलं. 
 
"भारतात भ्रष्टाचाराविषयी लोकांच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. माझ्या सरकारवर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. सरकारच्या कामकाज करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासन चालवताना पारदर्शकता येत आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी आपल्या सरकारच्या कामकाजाचा पाढा येथील भारतीय वंशाच्या नागरीकांसमोर वाचला. देशातील अनेक श्रीमंतांनी गॅस सब्सिडी सोडली असून त्याचा गरिबांना फायदा होत असल्याचं ते म्हणाले. 
 
दरम्यान, आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला. ""दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याची जाणीव झाली. आमच्या सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही"" हे सांगतानाच त्यांनी पुढे पाकिस्तानला चिमटा काढला. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले.
 
खरंतर इतर देशांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आमच्या निर्णयावर टीका केली असती, जगभरातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असते, आम्हाला विचारणा करण्यात आली असती, पण भारताने इतकं मोठं पाऊल उचलून कोणी साधी शंकाही उपस्थित केली नाही, असं मोदी म्हणाले. आम्ही जगाला दहशतवाद समजवायचो तेव्हा कोणाला समजत नव्हतं, आज दहशतवादाने स्वतःच जगाला याबाबत समजावलंय, त्यामुळे आता संपूर्ण जगाला दहशतवाद समजला आहे, असं दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले.
 
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मोदींनी विशेष कौतूक केलं. सोशल मीडियाचा खरा उपयोग स्वराज यांनी करून दाखवला. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या 80 हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचं मोदी म्हणाले.