शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे सरकारी बंगल्याचे स्मारकात रूपांतर नाही : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

By admin | Updated: October 19, 2014 01:33 IST

दिल्लीतील कोणत्याही सरकारी बंगल्याचे यापुढे स्मारकामध्ये रूपांतर केले जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

नवी दिल्ली : दिल्लीतील कोणत्याही सरकारी बंगल्याचे यापुढे स्मारकामध्ये रूपांतर केले जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंग यांनी वडील माजी पंतप्रधान चरणसिंग यांचे शासकीय निवासस्थान स्मारकामध्ये रूपांतर करण्याची मागणी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर काही आठवडय़ांनी सरकारने हा धोरणात्मक निर्णय जाहीर केला.
केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन आणि जयंती सरकारकडून साजरा केली जाईल. अन्य दिवंगत नेत्यांचे स्मृतिदिन किंवा जयंती साजरी करण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्ट, पक्ष, सोसायटी किंवा समर्थकांवर राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. 
स्मारक असो की दिवंगत राष्ट्रीय नेत्यांच्या समाधीचे व्यवस्थापन असो, यापुढे सरकारी बंगले दिले जाणार नाहीत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केले. 
 
वादाची पाश्र्वभूमी : अजितसिंग हे केंद्रीय मंत्री असताना त्यांना 12 तुघलक रोड बंगला देण्यात आला होता. त्यांनी हा बंगला खाली करण्यास नकार देत तेथे पित्याचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. यावर्षाच्या प्रारंभी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्ष मीराकुमार यांचे सरकारी निवासस्थान त्यांचे वडील माजी उपपंतप्रधान जगजीवनराम यांच्या स्मारकात रूपांतरित करण्यावरून वाद उफाळला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने 25 वर्षासाठी स्मारक म्हणून बंगल्याच्या वापराला परवानगी दिली. प्रत्यक्षात रालोआ सरकारने 2000 मध्ये घेतलेल्या निर्णयाला त्यामुळे छेद दिला. बसपाप्रमुख मायावती यांनी मोक्याच्या ठिकाणच्या बंगल्याचे कांशीराम यांच्या स्मारकात रूपांतर केले आहे.