शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पीएम होण्याची महत्त्वाकांक्षा नाही

By admin | Updated: July 4, 2017 01:16 IST

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक भूमिका घेऊन भाजपाला सशक्त पर्याय उभा होऊ शकणार नाही. यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा लागेल. पण त्यासाठी ध्येयधोरणे व दृष्टी बदलावी लागेल. पंतप्रधान होण्याची आपली क्षमता नाही व तशी आपली महत्वाकांक्षाही नाही. आमचा पक्ष खूप लहान आहे. त्यामुळे अशी मनिषा बाळगणे योग्यही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार म्हणाले की, विरोधकांकडे एक अजेंडा असायला हवा. तो सद्या नाही. नितीशकुमार व काँग्रेसच्या नेतृत्वात अलीकडच्या काळात मतभेद दिसून येत आहेत. पण, यामागचे नेमके कारण काय आहे ते नितीशकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची यावेळी उपस्थिती होती. नितीशकुमार म्हणाले की, आतार्यंत हे दिसून आले आहे की, ज्या व्यक्तीचे नाव चर्चेत असते त्याला हे पद कधीच मिळत नाही. भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पर्यायी अजेंडा तयार करण्याची गरज आहे. २०१५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीने मिळविलेला विजय म्हणजे केवळ विरोधकांची एकी नव्हती तर आमचा एक अजेंडा होता. तसेच आम्ही पूर्वी केलेली कामे होती. त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. २७ आॅगस्ट रोजी राजदच्या रॅलीबाबत अनौपचारिक निमंत्रण मिळाले आहे औपचारिक निमंत्रणही मिळेल, असेही ते म्हणाले.अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले आहेतराष्ट्रपतीपदासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या स्थितीला त्यांनी प्रतिक्रियात्मक अजेंडा म्हणून संबोधले. तर, शेतकऱ्यांची दुर्दशा, गायींच्या सुरक्षेवरुन होत असलेला हिंसाचार हे मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत, असेही ते म्हणाले.