शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही - कृपाशंकर सिंह

By admin | Updated: October 9, 2014 04:11 IST

समाजातील सर्व घटकांचा विचार व विकास करण्याचे काम केवळ कॉँग्रेस पक्षच करतो. अन्य कोणत्याही पक्षात ती धमक नाही.

मुंबई : समाजातील सर्व घटकांचा विचार व विकास करण्याचे काम केवळ कॉँग्रेस पक्षच करतो. अन्य कोणत्याही पक्षात ती धमक नाही. त्यामुळे राज्याला देशात अग्रेसर ठेवण्यासाठी सुजाण नागरिक कॉँग्रेसला पूर्ण बहुमत देतील, असा आपला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन कलिना विधानसभा मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केले. कलिनातील चुनाभट्टी शास्त्रीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी या मतदारसंघात केलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘सेना-भाजपासह अनेक जातीयवादी पक्ष केवळ विशिष्ट धर्म, गटाबाबत विचार करतो. मात्र केवळ काँग्रेसने नेहमी दीनदलित, अल्पसंख्याकांसह सर्व समाजाच्या विकासासाठी राजकारण केले आहे. जाहिरातीद्वारे जनतेची दिशाभूल करून केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे खरे रूप उघड झाले आहे. त्यामुळे मतदार आता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. गेली १५ वर्षे इथल्या बहुजन, अल्पसंख्याक समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले असून या निवडणुकीत ते जातीयवादी पक्षासह राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत.’ या वेळी दलित चळवळीतील प्रकाश मोरे म्हणाले, ‘बहुजन समाजातील काही तथाकथित व स्वयंघोषित नेते स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपा व अन्य पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी जनता त्यांच्या मागे जाणार नाही. कृपाशंकर सिंह यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा विडा आम्ही उचलला आहे.’ रॅलीमध्ये महिला, तरुणींसह परिसरातील अबालवृद्धांचा समावेश होता. (प्रतिनिधी)