शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

गरिबीची नवी व्याख्या येतेय!

By admin | Updated: July 25, 2015 02:10 IST

‘अच्छे दिन’ २५ वर्षे येणार नसले तरी, वाऱ्यावर सोडलेल्या गरिबांना ‘गरिबीच्या नव्या व्याख्ये’त केंद्र सरकार बसविणार आहे. दरडोई मासिक उत्पन्नावरून ठरणारी पारंपरिक

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली ‘अच्छे दिन’ २५ वर्षे येणार नसले तरी, वाऱ्यावर सोडलेल्या गरिबांना ‘गरिबीच्या नव्या व्याख्ये’त केंद्र सरकार बसविणार आहे. दरडोई मासिक उत्पन्नावरून ठरणारी पारंपरिक दारिद्र्य निर्मूलनाची पद्धत केंद्र सरकार मोडीत काढत असून, ३१ आॅगस्टपर्यंत ‘गरिबीची व्यावहारिक व्याख्या’ निश्चित केली जाणार आहे. नव्या व्याख्येने गरिबांच्या खिशात किती पैसे पडतील याचा अंदाज व्याख्या आल्यावरच समजू शकेल. देशात सध्या लागू असलेल्या योजनांमधून गरिबांना फायदा होत नसल्यास त्या रद्दही केल्या जाणार आहेत. योजना मंत्रालयाच्या ताज्या माहितीतून हा उलगडा झाला. मजेची बाब अशी, देशात सध्या दारिद्र्यरेषेखाली नेमके किती लोक आहेत, याचा काहीच पत्ता सरकारला नाही. कारण मागील तीन वर्षांत एकदाही सर्वेक्षण झालेले नाही. तीन वर्षांपूर्वी देशात २६ कोटी तर महाराष्ट्रात सव्वा कोटी लोक गरीब होते. त्याच आधारावर नवी व्याख्या करायला सरकारचा निती आयोग कामी लागला आहे.सध्याचा महागाईचा दर पाहता ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारच्या काळात ही संख्या कदाचित वाढण्याचा धोका जाणकारांनी व्यक्त केलामहागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मागील तीन वर्षांत देशात दारिद्र्यरेषेखालील लोक किती आहेत याचा कोणताही अभ्यास केंद्राने केला नसल्याचे अधिकृत दस्तावेज उघड झाले आहेत.----------------------------------------------गोपनीय पद्धतीने नोंदणी सुरु२०१२मध्ये देशात २६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते. या संख्येचा वापर करून ग्रामीण भागात दरमहा ८१६ रुपये व शहरी भागात १ हजार रुपये दरडोई मासिक उत्पन्न असल्याचे नियोजन आयोगाने निश्चित केले होते. महागाई सतत वाढतच असताना २००४ - २००५ साली देशात ४०.७ कोटी असलेल्या गरिबांची संख्या २०११-१२च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणात घटून २६.९ कोटी झाल्याचे केंद्राने कागदोपत्री जाहीर केले होते. महागाईने जनता पोळली जात असल्याने व गरिबीची जुनी व्याख्या त्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी अडचणीत आणत असल्याने निती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडिया यांच्या अध्यक्षतेखाली भारतामधील गरिबी निर्मूलन करण्यास कृतिगट स्थापन केला आहे. गरिबीची नवी व्यावहारिक व्याख्या कशी असावी यावर अनेक तर्क काढले जात आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांच्या नोंदी होत असून, केंद्राच्या १४ योजनांना केंद्रस्थानी ठेवून व्याख्या अस्तित्वात येईल.