शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

गरिबीची नवी व्याख्या येतेय!

By admin | Updated: July 25, 2015 02:10 IST

‘अच्छे दिन’ २५ वर्षे येणार नसले तरी, वाऱ्यावर सोडलेल्या गरिबांना ‘गरिबीच्या नव्या व्याख्ये’त केंद्र सरकार बसविणार आहे. दरडोई मासिक उत्पन्नावरून ठरणारी पारंपरिक

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली ‘अच्छे दिन’ २५ वर्षे येणार नसले तरी, वाऱ्यावर सोडलेल्या गरिबांना ‘गरिबीच्या नव्या व्याख्ये’त केंद्र सरकार बसविणार आहे. दरडोई मासिक उत्पन्नावरून ठरणारी पारंपरिक दारिद्र्य निर्मूलनाची पद्धत केंद्र सरकार मोडीत काढत असून, ३१ आॅगस्टपर्यंत ‘गरिबीची व्यावहारिक व्याख्या’ निश्चित केली जाणार आहे. नव्या व्याख्येने गरिबांच्या खिशात किती पैसे पडतील याचा अंदाज व्याख्या आल्यावरच समजू शकेल. देशात सध्या लागू असलेल्या योजनांमधून गरिबांना फायदा होत नसल्यास त्या रद्दही केल्या जाणार आहेत. योजना मंत्रालयाच्या ताज्या माहितीतून हा उलगडा झाला. मजेची बाब अशी, देशात सध्या दारिद्र्यरेषेखाली नेमके किती लोक आहेत, याचा काहीच पत्ता सरकारला नाही. कारण मागील तीन वर्षांत एकदाही सर्वेक्षण झालेले नाही. तीन वर्षांपूर्वी देशात २६ कोटी तर महाराष्ट्रात सव्वा कोटी लोक गरीब होते. त्याच आधारावर नवी व्याख्या करायला सरकारचा निती आयोग कामी लागला आहे.सध्याचा महागाईचा दर पाहता ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारच्या काळात ही संख्या कदाचित वाढण्याचा धोका जाणकारांनी व्यक्त केलामहागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मागील तीन वर्षांत देशात दारिद्र्यरेषेखालील लोक किती आहेत याचा कोणताही अभ्यास केंद्राने केला नसल्याचे अधिकृत दस्तावेज उघड झाले आहेत.----------------------------------------------गोपनीय पद्धतीने नोंदणी सुरु२०१२मध्ये देशात २६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते. या संख्येचा वापर करून ग्रामीण भागात दरमहा ८१६ रुपये व शहरी भागात १ हजार रुपये दरडोई मासिक उत्पन्न असल्याचे नियोजन आयोगाने निश्चित केले होते. महागाई सतत वाढतच असताना २००४ - २००५ साली देशात ४०.७ कोटी असलेल्या गरिबांची संख्या २०११-१२च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणात घटून २६.९ कोटी झाल्याचे केंद्राने कागदोपत्री जाहीर केले होते. महागाईने जनता पोळली जात असल्याने व गरिबीची जुनी व्याख्या त्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी अडचणीत आणत असल्याने निती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडिया यांच्या अध्यक्षतेखाली भारतामधील गरिबी निर्मूलन करण्यास कृतिगट स्थापन केला आहे. गरिबीची नवी व्यावहारिक व्याख्या कशी असावी यावर अनेक तर्क काढले जात आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांच्या नोंदी होत असून, केंद्राच्या १४ योजनांना केंद्रस्थानी ठेवून व्याख्या अस्तित्वात येईल.