शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवरून वाद वाढला

By admin | Updated: June 11, 2016 06:03 IST

अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा धोका आहे की नाही यावरून आता वाद

सुरेश के. डुग्गर,

श्रीनगर- अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा धोका आहे की नाही यावरून आता वाद सुरू झाला असून, भारतीय लष्कराने धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी यांनी मध्यंतरी स्वत:चा एक व्हिडीओ प्रसारित करून अमरनाथ यात्रेकरूंना अजिबात त्रास होणार नाही, याची ग्वाही दिली होती. मात्र बीएसएफच्या एका वाहनावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान मरण पावल्यानंतर अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची ही पूर्वतयारी असल्याचे जाहीर केल्यामुळे वाद वाढला आहे आणि यात्रेकरूंमध्येही काहीशी घबराट आहे.गेल्या आठवड्यात बीएसएफच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यात तीन जवान मरण पावले. त्यानंतर लगेच बीएसएफच्या महासंचालकांनी हा हल्ला म्हणजे यात्रेकरूंवरील हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दिनने बुरहान वाणीचा व्हिडीओ प्रसारित करून, आम्ही अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करण्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे जीओसी मेजर जनरल अशोक नरोला यांनीही यात्रेकरूंवर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली. पण त्यांच्या वरील विधानानंतर वाद मिटण्याऐवजी वाढला आहे. दहशतवादी आणि भारतीय लष्कर हल्ल्याची शक्यता अमान्य करीत असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिक सुरक्षा दले पाठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दले दाखल होत आहेत. राज्य सरकारने निमलष्कराच्या १00 तुकड्या मागवल्या असताना, केंद्राने १२५ तुकड्या पाठवल्या आहेत. लष्कर आणि बीएसएफ यांच्यातील मतभेद तसेच केंद्र सरकारने पाठविलेल्या अधिक तुकड्या यामुळे अमरनाथ यात्रेकरूंच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात अनेकदा हवामान बिघडण्याची आणि नैसर्गिक आपत्तीची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत, यंदा राष्ट्रीय आपत्ती सहाय्य पथकेही इथे दाखल झाली आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर ती दिसू लागली आहेत.>क्षीर भवानी यात्रा : काश्मिरी पंडितांची गर्दीयंदा रमजानच्या काळातच क्षीर भवानी यात्रा होत असून, त्यासाठी गंदरबल जिल्ह्यातील तुलमल्ला गावात काश्मिरी पंडितांची गदी आतापासूनच सुरू झाली आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात वसविण्याची चर्चा सुरू असतानाच, बाहेर राज्यांतील अनेक काश्मिरी पंडितही यंदा इथे दाखल झाले आहे. अमरनाथ यात्रेनंतर क्षीर भवानी देवीची यात्रा महत्त्वाची मानली जाते. ही यात्रा दरवर्षी मे ते जुलैच्या दरम्यान होते.