शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवरून वाद वाढला

By admin | Updated: June 11, 2016 06:03 IST

अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा धोका आहे की नाही यावरून आता वाद

सुरेश के. डुग्गर,

श्रीनगर- अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा धोका आहे की नाही यावरून आता वाद सुरू झाला असून, भारतीय लष्कराने धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी यांनी मध्यंतरी स्वत:चा एक व्हिडीओ प्रसारित करून अमरनाथ यात्रेकरूंना अजिबात त्रास होणार नाही, याची ग्वाही दिली होती. मात्र बीएसएफच्या एका वाहनावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान मरण पावल्यानंतर अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची ही पूर्वतयारी असल्याचे जाहीर केल्यामुळे वाद वाढला आहे आणि यात्रेकरूंमध्येही काहीशी घबराट आहे.गेल्या आठवड्यात बीएसएफच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यात तीन जवान मरण पावले. त्यानंतर लगेच बीएसएफच्या महासंचालकांनी हा हल्ला म्हणजे यात्रेकरूंवरील हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दिनने बुरहान वाणीचा व्हिडीओ प्रसारित करून, आम्ही अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करण्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे जीओसी मेजर जनरल अशोक नरोला यांनीही यात्रेकरूंवर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली. पण त्यांच्या वरील विधानानंतर वाद मिटण्याऐवजी वाढला आहे. दहशतवादी आणि भारतीय लष्कर हल्ल्याची शक्यता अमान्य करीत असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिक सुरक्षा दले पाठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दले दाखल होत आहेत. राज्य सरकारने निमलष्कराच्या १00 तुकड्या मागवल्या असताना, केंद्राने १२५ तुकड्या पाठवल्या आहेत. लष्कर आणि बीएसएफ यांच्यातील मतभेद तसेच केंद्र सरकारने पाठविलेल्या अधिक तुकड्या यामुळे अमरनाथ यात्रेकरूंच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात अनेकदा हवामान बिघडण्याची आणि नैसर्गिक आपत्तीची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत, यंदा राष्ट्रीय आपत्ती सहाय्य पथकेही इथे दाखल झाली आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर ती दिसू लागली आहेत.>क्षीर भवानी यात्रा : काश्मिरी पंडितांची गर्दीयंदा रमजानच्या काळातच क्षीर भवानी यात्रा होत असून, त्यासाठी गंदरबल जिल्ह्यातील तुलमल्ला गावात काश्मिरी पंडितांची गदी आतापासूनच सुरू झाली आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात वसविण्याची चर्चा सुरू असतानाच, बाहेर राज्यांतील अनेक काश्मिरी पंडितही यंदा इथे दाखल झाले आहे. अमरनाथ यात्रेनंतर क्षीर भवानी देवीची यात्रा महत्त्वाची मानली जाते. ही यात्रा दरवर्षी मे ते जुलैच्या दरम्यान होते.