शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

आपमध्ये मतभेद, योगेंद्र यादव व सिसोदीयांमध्ये जुंपली

By admin | Updated: June 6, 2014 12:18 IST

योगेंद्र यादव यांच्या चुकीच्या सल्ल्यामुऴेच लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसल्याचे मनीष सिसोदीयांनी म्हटले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ६ - अरविंद केजरीवाल यांना काही दिवस दिल्लीतील राजकारणातच राहायचे होते. मात्र योगेंद्र यादव व त्यांच्या काही सहका-यांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. याचा फटका पक्षाला बसल्याचे सांगत पक्षाचे नेते मनिष सिसोदीया यांनी लोकसभेतील पराभवाचे खापर योगेंद्र यादव यांच्यावर फोडले आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर शंका घेण्याचे कारण नसले तरी नेता म्हणून त्यांच्या अधिकारांवर निर्बंध आवश्यक असल्याचे परखड मत यादव यांनी मांडले आहे. त्यामुळे आपमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. 
लोकसभा निवडणुकीतील आपचा दारुण पराभव झाल्यावर पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हरियाणाची जबाबदारी असलेले योगेंद्र यादव आणि केजरीवाल यांचे विश्वासू साथीदार मनिष सिसोदीया यांच्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. मनिष सिसोदीया यांनी यादव यांना एक पत्र पाठवले असून यात त्यांनी यादव यांच्यावरच जोरदार टीका केली आहे. सिसोदीया म्हणतात, योगेंद्र यादव व त्यांच्या काही सहका-यांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. केजरीवाल व आम्हाला सध्या दिल्लीतच लक्ष द्यायचे होते. पण तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही लोकसभेत उतरलो व त्याचे परिणाम आम्हाला आता दिसले. 
यादव हे सध्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित नसतात. यावरही सिसोदीया यांनी जोरदार टीका केली. 'तुम्ही बैठकील न येता ईमेल किंवा पत्र पाठवतात. यातून तुम्हाला काय साध्य करायचे आहे. तुम्हाला पक्ष संपवायचा आहे का ? असा सवालही त्यांनी यादव यांना विचारला आहे. यादव यांनी हरियाणातील आपचे स्थानिक नेते नवीन जयहिंद यांच्यासोबतचे मतभेद जाहीररित्या समोर आणल्याविषयी सिसोदीया यांनी नाराजी व्यक्त केली. 
दुसरीकडे योगेंद्र यादव यांनीही आपला एक पत्र पाठवून पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. यात यादव यांनी केजरीवाल यांच्या अधिकारांवर काही प्रमाणात निर्बंध आणण्याची गरज व्यक्त केली. केजरीवाल यांचे नेतृत्व चांगले असले तरी काही वेळेला त्यांच्यामुळे पक्षाला निर्णय बदलावे लागले असे यादव यांनी सांगितले. 
दरम्यान, राज्यात अंजली दमानिया यांनी गुरुवारी आपच्या सर्व पदांवरुन दिलेला राजीनामा रात्री उशीरा मागे घेतला. आपमधील मतभेदांवर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत आपच्या देशभरातील प्रमुख नेत्यांनी एक बैठक होणार आहे.