शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

‘कोहिनूर’ मिळवण्याचे पर्याय नाहीत

By admin | Updated: September 22, 2016 04:19 IST

जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय करार आणि कायद्यांमुळे त्याला ब्रिटनकडून कायदेशीररीत्या परत मागता येत नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कोहिनूरबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांना भेट दिल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तो परत आणण्याचे कायदेशीर पर्याय नसले तरी परदेशाशी करार करून तो परत आणता येऊ शकेल काय, याची चाचपणी सुरू आहे. ब्रिटनकडून कोहिनूर परत मिळविण्यासाठी पुरेसे कायदेशीर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुत्सद्दी मार्गांचा अवलंब करावा लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी कायदे आणि करारांची मदत होऊ शकणार नाही, असे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही. पुराणवस्तूसंबंधीच्या युनेस्को कराराचीही मदत होऊ शकत नाही. कारण, हा हिरा देशाबाहेर गेल्यानंतर कितीतरी काळाने उभय देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. युनेस्कोचा हा करार स्वाक्षरी करणाऱ्या देशांच्या वस्तुसंग्रहालयांना एकमेकांच्या पुराणवस्तू आणि सांस्कृतिक वारसा हस्तगत करण्यास मज्जाव करतो. ब्रिटिश उच्चायुक्तांकडे कोहिनूर परत मागण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या आहेत...सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही.या हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या असल्याची आपणास पूर्ण जाणीव आहे, असे सरकारने शपथपत्रात नमूद केले.