शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

‘कोहिनूर’ मिळवण्याचे पर्याय नाहीत

By admin | Updated: September 22, 2016 04:19 IST

जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय करार आणि कायद्यांमुळे त्याला ब्रिटनकडून कायदेशीररीत्या परत मागता येत नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कोहिनूरबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांना भेट दिल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तो परत आणण्याचे कायदेशीर पर्याय नसले तरी परदेशाशी करार करून तो परत आणता येऊ शकेल काय, याची चाचपणी सुरू आहे. ब्रिटनकडून कोहिनूर परत मिळविण्यासाठी पुरेसे कायदेशीर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुत्सद्दी मार्गांचा अवलंब करावा लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी कायदे आणि करारांची मदत होऊ शकणार नाही, असे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही. पुराणवस्तूसंबंधीच्या युनेस्को कराराचीही मदत होऊ शकत नाही. कारण, हा हिरा देशाबाहेर गेल्यानंतर कितीतरी काळाने उभय देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. युनेस्कोचा हा करार स्वाक्षरी करणाऱ्या देशांच्या वस्तुसंग्रहालयांना एकमेकांच्या पुराणवस्तू आणि सांस्कृतिक वारसा हस्तगत करण्यास मज्जाव करतो. ब्रिटिश उच्चायुक्तांकडे कोहिनूर परत मागण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या आहेत...सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही.या हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या असल्याची आपणास पूर्ण जाणीव आहे, असे सरकारने शपथपत्रात नमूद केले.