शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

... तर जीएसटी यापूर्वीच मंजूर झाले असते

By admin | Updated: August 9, 2016 03:09 IST

सरकारने यापूर्वीच सर्वसहमतीचा प्रयत्न केला असता, तर जीएसटी विधेयक यापूर्वीच मंजूर झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे सदस्य एम. वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले

नवी दिल्ली : सरकारने यापूर्वीच सर्वसहमतीचा प्रयत्न केला असता, तर जीएसटी विधेयक यापूर्वीच मंजूर झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे सदस्य एम. वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले. राज्यसभेत मंजूर झालेल्या या घटनादुरुस्ती विधेयकावर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. अण्णाद्रमुकवगळता अन्य सर्व पक्षांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी) संबंधित संशोधित विधेयकाला आपला पाठिंबा दर्शविला. मोईली म्हणाले, हे ऐतिहासिक विधेयक देशाच्या अर्थव्यवस्थेत नव्या कालखंडाची सुरुवात करील. आम्हाला हे मान्य करावेच लागेल की, १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात आर्थिक सुधारणांची सुरुवात केली होती. याबाबत संयुक्त समिती स्थापन करण्याचा आमचा सल्ला ऐकला नाही. शेवटी त्यांना वरच्या सभागृहात माघार घ्यावीच लागली व समितीची स्थापना करावी लागली. दरम्यान, जीएसटीच्या दराची मर्यादा १८ टक्के ठेवण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. तत्पूर्वी, विधेयक सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ही आनंदाची बाब आहे की, दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे विधेयक अखेर मंजूर झाले. व्यापक राष्ट्रहितासाठी एकमत होणे चांगला संदेश असल्याचेही ते म्हणाले. भाजपचे सुभाषचंद्र बहेरिया म्हणाले की, जीएसटीच्या माध्यमातून कर चोरी कमी होईल, पण करदात्यांना त्रस्त करायला नको, असेही ते म्हणाले. अण्णाद्रमुकचे के. पी. वेणूगोपाल म्हणाले की, आम्ही याबाबत राज्यसभेत काही सुधारणा सादर केल्या होत्या; पण त्याचा विचार झाला नाही. अण्णाद्रमुक सुरुवातीपासूनच या विधेयकाला विरोध करीत आहे. यातून तामिळनाडूसारख्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या राज्यांना नुकसान होईल, तर ग्राहकांच्या भूमिकेत असणाऱ्यांना फायदा होईल. जीएसटीच्या कराचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी म्हणाले की, आमचा पक्ष जीएसटीचे समर्थन करीत आहे. कारण, हे विधेयक लघु आणि मध्यम उद्योजकांच्या हिताचे आहे. कराशी संबंधित राज्यांचे हित जोपासले जावे अशी मागणीही त्यांनी केली. पश्चिम बंगालसाठी विशेष पॅकेजचीही त्यांनी मागणी केली. शिवसेनेचे आनंदराव आडसूळ म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयकावर आमच्या पक्षाने विरोध केला होता; पण आमचा विरोध हा जनतेच्या हितासाठी असतो. जिथे जनेतेचे हित आहे तिथे शिवसेना पाठिंबा देते. (लोकमत न्यूज नेटवर्क)