शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

... तर जीएसटी यापूर्वीच मंजूर झाले असते

By admin | Updated: August 9, 2016 03:09 IST

सरकारने यापूर्वीच सर्वसहमतीचा प्रयत्न केला असता, तर जीएसटी विधेयक यापूर्वीच मंजूर झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे सदस्य एम. वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले

नवी दिल्ली : सरकारने यापूर्वीच सर्वसहमतीचा प्रयत्न केला असता, तर जीएसटी विधेयक यापूर्वीच मंजूर झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे सदस्य एम. वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले. राज्यसभेत मंजूर झालेल्या या घटनादुरुस्ती विधेयकावर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. अण्णाद्रमुकवगळता अन्य सर्व पक्षांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी) संबंधित संशोधित विधेयकाला आपला पाठिंबा दर्शविला. मोईली म्हणाले, हे ऐतिहासिक विधेयक देशाच्या अर्थव्यवस्थेत नव्या कालखंडाची सुरुवात करील. आम्हाला हे मान्य करावेच लागेल की, १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात आर्थिक सुधारणांची सुरुवात केली होती. याबाबत संयुक्त समिती स्थापन करण्याचा आमचा सल्ला ऐकला नाही. शेवटी त्यांना वरच्या सभागृहात माघार घ्यावीच लागली व समितीची स्थापना करावी लागली. दरम्यान, जीएसटीच्या दराची मर्यादा १८ टक्के ठेवण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. तत्पूर्वी, विधेयक सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ही आनंदाची बाब आहे की, दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे विधेयक अखेर मंजूर झाले. व्यापक राष्ट्रहितासाठी एकमत होणे चांगला संदेश असल्याचेही ते म्हणाले. भाजपचे सुभाषचंद्र बहेरिया म्हणाले की, जीएसटीच्या माध्यमातून कर चोरी कमी होईल, पण करदात्यांना त्रस्त करायला नको, असेही ते म्हणाले. अण्णाद्रमुकचे के. पी. वेणूगोपाल म्हणाले की, आम्ही याबाबत राज्यसभेत काही सुधारणा सादर केल्या होत्या; पण त्याचा विचार झाला नाही. अण्णाद्रमुक सुरुवातीपासूनच या विधेयकाला विरोध करीत आहे. यातून तामिळनाडूसारख्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या राज्यांना नुकसान होईल, तर ग्राहकांच्या भूमिकेत असणाऱ्यांना फायदा होईल. जीएसटीच्या कराचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी म्हणाले की, आमचा पक्ष जीएसटीचे समर्थन करीत आहे. कारण, हे विधेयक लघु आणि मध्यम उद्योजकांच्या हिताचे आहे. कराशी संबंधित राज्यांचे हित जोपासले जावे अशी मागणीही त्यांनी केली. पश्चिम बंगालसाठी विशेष पॅकेजचीही त्यांनी मागणी केली. शिवसेनेचे आनंदराव आडसूळ म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयकावर आमच्या पक्षाने विरोध केला होता; पण आमचा विरोध हा जनतेच्या हितासाठी असतो. जिथे जनेतेचे हित आहे तिथे शिवसेना पाठिंबा देते. (लोकमत न्यूज नेटवर्क)