शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

...तर सीबीआय कोलमडून पडेल

By admin | Updated: April 27, 2016 04:43 IST

सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे

नवी दिल्ली : सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आमची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, असा इशारा सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिला आहे. संसदीय समितीपुढे सीबीआयची बाजू मांडताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षांत सीबीआयकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांकडूनही अधिक प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. वर्षांला सुमारे ७00 प्रकरणांचा तपास करण्याची आमची क्षमता असताना तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. आजच्या आमच्याकडे देशातील १२00 आणि परदेशांतील ६२ प्रकरणे तपासासाठी आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणे गेल्या तील वर्षांपासून आमच्याकडे पडून आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)अनिल स्निहा यांनी समितीला सांगितले की विविध राज्यांतून तसेच केंद्रीय तपास यंत्रणांतून अधिक काळासाठी आणि अधिक काळ काम करू शकणारे अधिकारी देण्यात यावेत>४एकीकडे तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत असताना सीबीआयमधील रिक्त जागांची संख्या मात्र १५३१ वर पोहोचली आहे. आम्हाला ७२२४ पदांची मान्यता असताना इतक्या जागा रिक्त राहिल्याचा परिणाम तपासावर होत आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.४त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संसदीय समितीने रिकामी पदे भरण्याबाबत केंद्र सरकारने लवकर आढावा, घ्यावा, असे सुचवले आहे. एवढी पदे रिकामी असल्याबद्दल समितीने तीव्र चिंताही व्यक्त केली.