शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

त्यांची सप्तपदी आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती

By admin | Updated: July 5, 2017 16:18 IST

या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली

ऑनलाइन लोकमत
सिहोर, दि. 5 - लग्न म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अवाढव्य खर्च. अनेकदा समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपली ऐपत नसतानाही लोक लाखो रुपये खर्च करुन लग्नसोहळा आयोजित करतात. कित्येकदा तर कर्ज काढून लग्न केलं जातं. मात्र मध्यप्रदेशातील एका जोडप्याने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशातील सिहोरमधील ही घटना आहे.
 
आणखी वाचा - 
त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न
पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
 
आर्थिक बाजू भक्कम नसल्याने कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया या जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी हा स्तुत्य निर्णय घेतला. दोघेही डॉ. आंबेडकर पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फेऱ्या घेऊन विवाहाबंधनात अडकले. लग्नासाठी पारंपारिक कपड्यांमध्ये उपस्थित असलेल्या कल्लू जाटव आणि वैजंती राजोरियाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकमेकांना हारदेखील घातला. 
 
नवरदेव कल्लूने दावा केला आहे की, त्याने लग्नासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत मदत मागितली होती. मात्र कोणत्याही प्रकारची मदत आपल्याला मिळाली नाही. यानंतर त्याने काही सामाजिक संस्था आणि लोकांची मदत घेत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करत दोघांनी अत्यंत कमी खर्चात लग्न केलं. 
 
या लग्नाच सामील झालेले सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र खंगराले यांनी सांगितलं आहे की, "वर आणि वधू दोघांच्याही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मोठ्या थाटामाटात लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही या जोडप्यासाठी अत्यंत साधा कार्यक्रम ठेवत विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला. 
 
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. खरं तर नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.