शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

त्यांची सप्तपदी आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती

By admin | Updated: July 5, 2017 16:18 IST

या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली

ऑनलाइन लोकमत
सिहोर, दि. 5 - लग्न म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अवाढव्य खर्च. अनेकदा समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपली ऐपत नसतानाही लोक लाखो रुपये खर्च करुन लग्नसोहळा आयोजित करतात. कित्येकदा तर कर्ज काढून लग्न केलं जातं. मात्र मध्यप्रदेशातील एका जोडप्याने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशातील सिहोरमधील ही घटना आहे.
 
आणखी वाचा - 
त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न
पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
 
आर्थिक बाजू भक्कम नसल्याने कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया या जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी हा स्तुत्य निर्णय घेतला. दोघेही डॉ. आंबेडकर पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फेऱ्या घेऊन विवाहाबंधनात अडकले. लग्नासाठी पारंपारिक कपड्यांमध्ये उपस्थित असलेल्या कल्लू जाटव आणि वैजंती राजोरियाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकमेकांना हारदेखील घातला. 
 
नवरदेव कल्लूने दावा केला आहे की, त्याने लग्नासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत मदत मागितली होती. मात्र कोणत्याही प्रकारची मदत आपल्याला मिळाली नाही. यानंतर त्याने काही सामाजिक संस्था आणि लोकांची मदत घेत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करत दोघांनी अत्यंत कमी खर्चात लग्न केलं. 
 
या लग्नाच सामील झालेले सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र खंगराले यांनी सांगितलं आहे की, "वर आणि वधू दोघांच्याही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मोठ्या थाटामाटात लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही या जोडप्यासाठी अत्यंत साधा कार्यक्रम ठेवत विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला. 
 
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. खरं तर नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.