शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

त्यांची सप्तपदी आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती

By admin | Updated: July 5, 2017 16:18 IST

या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली

ऑनलाइन लोकमत
सिहोर, दि. 5 - लग्न म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अवाढव्य खर्च. अनेकदा समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपली ऐपत नसतानाही लोक लाखो रुपये खर्च करुन लग्नसोहळा आयोजित करतात. कित्येकदा तर कर्ज काढून लग्न केलं जातं. मात्र मध्यप्रदेशातील एका जोडप्याने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशातील सिहोरमधील ही घटना आहे.
 
आणखी वाचा - 
त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न
पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
 
आर्थिक बाजू भक्कम नसल्याने कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया या जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी हा स्तुत्य निर्णय घेतला. दोघेही डॉ. आंबेडकर पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फेऱ्या घेऊन विवाहाबंधनात अडकले. लग्नासाठी पारंपारिक कपड्यांमध्ये उपस्थित असलेल्या कल्लू जाटव आणि वैजंती राजोरियाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकमेकांना हारदेखील घातला. 
 
नवरदेव कल्लूने दावा केला आहे की, त्याने लग्नासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत मदत मागितली होती. मात्र कोणत्याही प्रकारची मदत आपल्याला मिळाली नाही. यानंतर त्याने काही सामाजिक संस्था आणि लोकांची मदत घेत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करत दोघांनी अत्यंत कमी खर्चात लग्न केलं. 
 
या लग्नाच सामील झालेले सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र खंगराले यांनी सांगितलं आहे की, "वर आणि वधू दोघांच्याही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मोठ्या थाटामाटात लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही या जोडप्यासाठी अत्यंत साधा कार्यक्रम ठेवत विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला. 
 
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. खरं तर नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.