शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:16 IST

देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं गेलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे.

नवी दिल्ली-

देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं केलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे. आज सारे भ्रष्टाचारी लोक भाजपामध्ये आहेत. त्यामुळे ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. त्यादिवशी खऱ्या अर्थान देश भ्रष्टाचारमुक्त होईल, कारण सगळे भ्रष्टाचारी एकाच ठिकाणी असल्यानं त्यांना तुरुंगात धाडण्याचं काम सोपं होईल, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लगावला. ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. 

"ईडी, सीबीआयवाले येतात धाडी टाकतात. माथ्यावर बंदुक ठेवतात आणि तुरुंगात जायचंय की भाजपामध्ये जायचंय विचारतात. मनिष सिसोदियांच्या माथ्यावरही बंदुक ठेवली आणि असंच विचारलं गेलं. मनिष यांनी तुरुंगात जाणं पत्करलं पण भाजपात जाणार नाही सांगितलं. सत्येंद्र जैन यांच्याबाबतीतही असंच केलं. पण हेमंत बिसवा शर्मा, नारायण राणे, मुकुल रॉय, शुवेंद्रू अधिकारी यांनी चोरी केली होती. घोटाळे केले होते त्यामुळे त्यांनी माथ्यावर बंदुक ठेवताच भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला", असं केजरीवाल म्हणाले. 

"देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व आज भाजपामध्ये आहेत. वेळ काही सारखी राहत नाही. वेळ बदलते. आज मोदी पंतप्रधान आहेत. पण ते काही कायमस्वरुपी राहणार नाहीत. कधी ना कधी त्यांनाही जावच लागेल. त्यादिवशी खऱ्या अर्थानं भारत भ्रष्टाचारमुक्त होईल. कारण जितके चोर-भ्रष्टाचारी आहेत ते सगळे एकाच खोलीत आहेत. त्यांना पकडणं खूप सोपं होऊन जाईल. जास्त चौकशीची गरज पडणार नाही. त्यामुळे ज्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाही आणि भाजपाचं सरकार राहणार नाही. तेव्हा भाजपावाल्यांना तुरुंगात टाका हा देश भ्रष्टाचारमुक्त होऊन जाईल", असंही केजरीवाल पुढे म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी