शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू थळ मतदार संघ : जिल्‘ाच्या नजरा खिळणार येथील लढतीवर

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

आविष्कार देसाई : अलिबाग

आविष्कार देसाई : अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजपाचे रामशेठ ठाकूर, काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, माजी आमदार माणिक जगताप यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. परंतु निवडणुकीच्या धामधुमीत अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघ हा सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नजरा या मतदार संघावर खिळणार आहेत.
थळ मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी निवडणूक लढविणार आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पराकोटीचे नाराज असलेले महेंद्र दळवी थळ मतदार संघातील लढत प्रतिष्ठेची करणार आहेत. त्यामुळे वाघाच्या तोंडात कोण हात घालणार हे लवकरच समजणार आहे. २००६ साली झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महेंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी मानसी दळवी हे शेकापमध्ये होते. शेकापने त्यावेळी मानसी यांना उमेदवारी दिली होती. मानसी यांच्या विरोधात काँग्रेसच्या अनुराधा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मानसी या तब्बल सात हजार २१४ अशा प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार होत्या मात्र शेकापने त्यांना अध्यक्षपदी विराजमान न केल्याने अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाली होती. त्यावेळी महेंद्र दळवी कमालीचे संतप्त झाले होते. त्याबाबत त्यांनी शेकाप नेतृत्वावर जहाल टीका केली होती.
शेकापचा लालबावटा खाली ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. २०११ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने थळ मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी आमदार जयंत पाटील आणि आमदार सुनील तटकरे हे एकमेकांचे राजकीय वैरी होते. शेकापचे पाटील यांनी त्यांच्या मुलगा नृपाल पाटील यांना उमेदवारी दिली. दळवी यांच्या विरोधात नृपाल यांचा दोन हजार ८१ मतांनी दारुण पराभव केला होता. त्यावेळीही पाटील आणि दळवी यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदाराच्या मुलाचा दारुण पराभव करणारे दळवी यांची ओळख बनली. तटकरे यांनीही त्यांना अध्यक्षपदी बसविले नसल्याचे कारण देत दळवी यांनी पक्ष सोडला. त्यांनी नंतर आता शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी मानसी यांना आताच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. त्या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. शिवसेनेची ताकद वाढल्याने रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता येईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळे महेंद्र हे ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार यात शंका असण्याचे कारण नाही. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या उमेदवारांची यादी ३१ जानेवारीला जाहीर करणार आहेत. त्यामुळे थळ मतदार संघातून कोण लढणार हे लवकरच कळणार आहे.
...................
चौकट :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करीत आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तटकरे यांची आहे. तसेच तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना राज्यातील निवडणुका जिंकण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविण्यात आल्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना निवडणूक प्रतिष्ठेची करावी लागणार आहे.
...............................................
भाजपाचे रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे उरणचे आमदार मनोहर भोईर, कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुभाष पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, आमदार अनिल तटकरे यांचीही प्रतिष्ठापणाला लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघ हा सत्तासंर्घषाचा केंद्रबिंदू राहणार आहे. येथील लढतीवर जिल्ह्याच्या नजरा राहणार आहेत.