शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

उद्धव ठाकरे यांची शहा-पवार यांच्यावर टीका

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी
-उद्धव ठाकरे यांचा शहा-पवारांना टोला
मुंबई: कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणार्‍यांनी आधी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं. तिथं सत्ता कोणाची आहे ते आपल्याला माहित नाही, असे उपरोधिकपणे म्हणत ठाकरे म्हणाले की, मुंबईत एका दिवसात ३०० मि.मी. पाऊस होऊन पाणी तुंबले तर अनेकांना नालेसफाईची आठवण झाली. मात्र दिल्लीत केवळ १०० मि.मी. पाऊस होऊन दिल्ली तुंबली. दिल्लीत नाले आहेत की नाही ते मला माहित नाही. परंतु आता काहींना नालेसफाईची आठवण कशी झाली नाही, असा टोला उद्धव यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना लगावला.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी महापालिका अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना उद्धव यांनी संबोधित केले. यावेळी पालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक, विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे. त्याला विरोध करायला तो काही दाऊदचा उत्सव नाही. त्याला ब्रिटिशांनीही विरोध केला नाही. गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार, हा मुर्दडांचा नाही तर जिवंत माणसांचा उत्सव आहे. तो दणक्यातच साजरा होणार, असा आदेश ठाकरे दिला.
कोणत्याही परिस्थित शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. त्याविरोधात न्यायालयात जावे असे कोणाला वाटत नाही. पण, आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का आणता, असा उद्गीग्न सवाल करतानाच विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. (विशेष प्रतिनिधी)
.....................................................
कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री
गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अभ्यास करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले असून कायद्याची व्याप्ती वाढवण्यासंबंधी काही दुरुस्ती करण्याची गरज वाटली तर ते तशी शिफारस करणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. न्यायालयाचा सन्मान राखायचा परंतु उत्सव बंद करता येणार नाही याचेही भान राखायचे हे लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.