शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

By admin | Updated: February 18, 2017 04:51 IST

पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील

लंडन : पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील गटाने म्हटले आहे.इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने (आयसीजी) पाकिस्तानवरील अहवालात म्हटले की, लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारत विरोधी संघटनांना मदरसे व धार्मिक संस्था चालवण्यासाठी सुरक्षा दले मदत करतात. पाकिस्तानमधील सर्वांत धोकादायक गट कराची येथून विविध कारवायांत सक्रिय भाग घेत आहेत. शियाविरोधी लष्कर-ए-झांगवी व भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे जवळचे संबंध आहेत. ब्रुसेल्स येथील या विचारगटाने म्हटले की, दशकानुदशकांचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कायदा-सुव्यवस्था यामुळे कराचीचे रूपांतर प्रेशर कुकरमध्ये झाले आहे. जेव्हा जेव्हा भारत-पाकसंबंधांत किंवा काश्मिरात तणाव असतो तेव्हा तेव्हा हे गट शहरातील मध्यवर्ती भागांत सुरक्षित असतात. लष्कर किंवा जैश यासारख्या संघटना देशाच्या एका भागात मित्र आणि दुसऱ्या भागात शत्रूचे काम करतात, असे तर पाकचे सरकार म्हणू शकत नाही ना. सरकारचा छुपा पाठिंबा व कमालीची अनागोंदीची स्थिती, यामुळे जिहादी गटांचे चांगलेच फावले, असेही अहवालात म्हटले आहे.सूत्रांचा हवाला देत आयसीजीने म्हटले की, अनेक जिहादींचे सूत्रधार सप्टेंबर २०१३ मध्ये सैनिकी कारवाईच्या भीतीतून कराचीला पळून आले. मात्र, आता कारवाई होत नसल्याने कराचीतच स्थायिक झाले असावेत. आयसीजीने पाकच्या सेवानिवृत्त वरिष्ठ प्रांतीय अधिकाऱ्याचा हवाला  देऊन म्हटले की, पाक-भारत किंवा काश्मीरवरून तणाव वाढतो तेव्हा हे  गट शहराच्या मुख्य भागात सक्रिय  होतात. (वृत्तसंस्था) बेरोजगारीमुळे संघटनांचे फावते...कराचीतील पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन आयसीजीने म्हटले की, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेगळा असल्याचे बघण्याची सवय लागली आहे. आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही त्या प्रश्नाकडे आमच्या परराष्ट्र धोरणातूनही बघायला हवे. या अहवालात असेही म्हटले आहे की जिहादींच्या बाजूने असलेले महत्वाचे मदरसे त्यांना हवे तसे वागत आहेत. बेरोजगारीमुळे वेगळे पडलेले युवक वा तरूण जिहादींच बनतात, असे समजणे योग्य नाही. उत्पन्नाचे साधन नसणाऱ्यांना ओढतात जाळ्यातचांगला पैसा मिळत असलेल्या कराचीतील जिहादी संघटनांबद्दल अहवालात माहिती आहे. जगण्याचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्यांना करातीचील जिहादी संघटना खास पुढाकार घेऊन आपल्यात ओढतात. त्यापैकी अनेकांना इतर पर्याय फारच थोडे उपलब्ध असतात त्यांना जिहाद हे काम मिळते, असे आयसीजीने म्हटले.