शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

By admin | Updated: February 18, 2017 04:51 IST

पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील

लंडन : पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील गटाने म्हटले आहे.इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने (आयसीजी) पाकिस्तानवरील अहवालात म्हटले की, लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारत विरोधी संघटनांना मदरसे व धार्मिक संस्था चालवण्यासाठी सुरक्षा दले मदत करतात. पाकिस्तानमधील सर्वांत धोकादायक गट कराची येथून विविध कारवायांत सक्रिय भाग घेत आहेत. शियाविरोधी लष्कर-ए-झांगवी व भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे जवळचे संबंध आहेत. ब्रुसेल्स येथील या विचारगटाने म्हटले की, दशकानुदशकांचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कायदा-सुव्यवस्था यामुळे कराचीचे रूपांतर प्रेशर कुकरमध्ये झाले आहे. जेव्हा जेव्हा भारत-पाकसंबंधांत किंवा काश्मिरात तणाव असतो तेव्हा तेव्हा हे गट शहरातील मध्यवर्ती भागांत सुरक्षित असतात. लष्कर किंवा जैश यासारख्या संघटना देशाच्या एका भागात मित्र आणि दुसऱ्या भागात शत्रूचे काम करतात, असे तर पाकचे सरकार म्हणू शकत नाही ना. सरकारचा छुपा पाठिंबा व कमालीची अनागोंदीची स्थिती, यामुळे जिहादी गटांचे चांगलेच फावले, असेही अहवालात म्हटले आहे.सूत्रांचा हवाला देत आयसीजीने म्हटले की, अनेक जिहादींचे सूत्रधार सप्टेंबर २०१३ मध्ये सैनिकी कारवाईच्या भीतीतून कराचीला पळून आले. मात्र, आता कारवाई होत नसल्याने कराचीतच स्थायिक झाले असावेत. आयसीजीने पाकच्या सेवानिवृत्त वरिष्ठ प्रांतीय अधिकाऱ्याचा हवाला  देऊन म्हटले की, पाक-भारत किंवा काश्मीरवरून तणाव वाढतो तेव्हा हे  गट शहराच्या मुख्य भागात सक्रिय  होतात. (वृत्तसंस्था) बेरोजगारीमुळे संघटनांचे फावते...कराचीतील पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन आयसीजीने म्हटले की, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेगळा असल्याचे बघण्याची सवय लागली आहे. आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही त्या प्रश्नाकडे आमच्या परराष्ट्र धोरणातूनही बघायला हवे. या अहवालात असेही म्हटले आहे की जिहादींच्या बाजूने असलेले महत्वाचे मदरसे त्यांना हवे तसे वागत आहेत. बेरोजगारीमुळे वेगळे पडलेले युवक वा तरूण जिहादींच बनतात, असे समजणे योग्य नाही. उत्पन्नाचे साधन नसणाऱ्यांना ओढतात जाळ्यातचांगला पैसा मिळत असलेल्या कराचीतील जिहादी संघटनांबद्दल अहवालात माहिती आहे. जगण्याचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्यांना करातीचील जिहादी संघटना खास पुढाकार घेऊन आपल्यात ओढतात. त्यापैकी अनेकांना इतर पर्याय फारच थोडे उपलब्ध असतात त्यांना जिहाद हे काम मिळते, असे आयसीजीने म्हटले.