शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी पाकमधून आल्याचे निष्पन्न

By admin | Updated: July 29, 2015 01:58 IST

संशयित लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बामियाल गावातून भारतात घुसल्याचे पंजाबच्या गुरुदासपूर येथील सोमवारच्या

गुरुदासपूर : संशयित लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बामियाल गावातून भारतात घुसल्याचे पंजाबच्या गुरुदासपूर येथील सोमवारच्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दहशतवाद्यांजवळून हस्तगत करण्यात आलेला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या तपासात महत्त्वाचा धागा ठरण्याची शक्यता आहे. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जीपीएसचा वापर केला जातो. हे दहशतवादी जीपीएसच्या मदतीनेच गुरुदासपूर येथे दाखल झाल्याने ते नेमके कोठून आणि कोणत्या मार्गाने आले हे आता स्पष्ट होईल. हा जीपीएस फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. दरम्यान, दीनानगर पोलीस ठाण्याजवळच्या ज्या इमारतीत दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता, त्या इमारतीला फोरेन्सिक पथकाने चौकशीचा एक भाग म्हणून मंगळवारी भेट दिली. देवेंदर पाल सहगल आणि अश्विनी कुमार यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने या हल्ल्याच्या चौकशीला प्रारंभ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.दहशतवाद्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे होती आणि पोलिसांनी त्यांच्याजवळून चिनी बनावटीचे हातबॉम्ब आणि एके ४७ रायफल्स जप्त केल्या आहेत. हा हल्ला नियोजित असल्याचा दावा पोलिसांनी केला.हे दहशतवादी जम्मू आणि पठाणकोटदरम्यानची कुंपण नसलेली सीमा अथवा चाक हिरा भागातून भारतात घुसल्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांची सिव्हिल लाईन भागातही हल्ला करण्याची योजना होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान हे दहशतवादी रावी नदीवरील धरण ओलांडून भारतात आल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या जीपीएसवरून स्पष्ट झाले आहे. (वृत्तसंस्था)शहीद बलजितसिंग यांच्या कुटुंबियांचा अंत्यसंस्कारास नकारकपूरथळा : गुरुदासपूरच्या दीनानगर येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग यांच्या पुत्राला पोलीस अधीक्षकाचा दर्जा आणि दोन्ही कन्येला तहसीलदारपदाचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय बलजितसिंग यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे.‘माझे सासरे पोलीस निरीक्षक अच्छारसिंग यांच्या मृत्यूनंतर माझ्या पतीला नियुक्तीपत्र मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. माझ्या पतीला नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेऊनच आम्ही आधी नियुक्तपत्र आणि नंतर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली आहे,’ असे बलजितसिंग यांची पत्नी कुलवंत कौर यांनी म्हटले आहे. बलजितसिंग यांचे वडील अच्छारसिंग हेही १९८४ मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते.सोमवारच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि प्रत्येकी १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. बलजितसिंग यांच्या मागे पत्नी कुलवंत कौर, पुत्र मनिंदर सिंग (२४) आणि परमिंदर कौर (२२) व रविंदर कौर (२०) या दोन कन्या आहेत.