शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधूनच आले होते दहशतवादी

By admin | Updated: July 31, 2015 01:56 IST

गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते

नवी दिल्ली : गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून होणारी ही घुसखोरी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजनाथसिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळातच गुरुदासपूर हल्ल्यावर निवेदन केले. ते म्हणाले, पंजाब पोलिसांनी यशस्वी मोहीम राबवून या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले; परंतु या दरम्यान होमगार्डचे तीन जवान, एक पोलीस अधीक्षक शहीद झाले, तसेच तीन नागरिक ठार, तर दहा नागरिक व सात पोलीस जखमी झाले. दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ रायफल्स, १९ मॅगझिन्स आणि दोन जीपीएस हस्तगत करण्यात आले आहेत. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच राजनाथसिंह पुढे म्हणाले, ‘भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यास सरकार कटिबद्ध आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जातील.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसचे बेजबाबदार वर्तन -जेटलीराजनाथसिंह यांना गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्यावर निवेदन करण्यापासून रोखण्याची काँग्रेसची कृती बेजबाबदारपणाची आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.सीमापार दहशतवादावर संसदेत निवेदन करण्यापासून राजनाथसिंह यांना रोखून काँग्रेसने देशाची प्रतिमा ‘विभक्त घर’ म्हणून सादर केली आहे, असे जेटली म्हणाले. याकूब मेमनच्या फाशीबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांवरही त्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस नेत्यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्ये ही चिंतेचा विषय आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मुद्यावर पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन जेटली यांनी केले.गुरुदासपूरचा हल्ला हा पाकिस्तान प्रायोजित असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि या हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू राहणार किंवा काय याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. राजनाथसिंह हे निवेदन देत असताना काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ‘हे राजकारण नाही. दहशतवादी हल्ल्यावरील निवेदन आहे,’ असे सांगून उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले; परंतु काँग्रेस सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. भारताचा आरोप पाकने फेटाळलाइस्लामाबाद- पंजाबमधील गुरुदासपूर हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानातून आल्याचा भारताचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चौकशी न करताच पाकिस्तानकडे बोट दाखविणे हे योग्य नाही असे पाकने म्हटले आहे.गुरुदासपूर येथील हल्ल्याचा आम्हीही कडक शब्दात निषेध केला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.