शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काश्मिरात मारले गेलेले दहशतवादी विदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:44 IST

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.‘या दहशतवाद्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे व अन्य साहित्यावरून ते विदेशी नागरिक आणि लष्कर- ए- तोयबाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत शहीद झालेल्या दोन कमांडर्सना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.तथापि, हे पाचही दहशतवादी नुकतेच भारतात घुसले होते की, आधीपासूनच मुक्कामाला होते किंवा ते एखाद्या नव्या दहशतवादी गटाचे सदस्य होते काय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे दुआ म्हणाले. या भागात आणखी किती दहशतवादी दडून बसलेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. जैश- ए- मोहंमदचा या भागात फारसा प्रभाव असेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुपवाडाच्या झोनरेशी गावात शुक्रवारी सुरू झालेली चकमक शनिवारी संपली होती, ज्यात हे पाच दहशतवादी ठार आणि दोन जवान शहीद झाले होते.घुसखोरीत घट झाल्याचा दावामागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी काश्मिरात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविणाऱ्या ठिकाणी शंभरपेक्षाही कमी दहशतवादी आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केला.२०१५ मध्ये घुसखोरीच्या ६०० पेक्षा जास्त घटना घडल्या होत्या. आता त्यात घट झाली आहे. आता शंभरेक दहशतवादी सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत असू शकतात; पण ही संख्या गतवर्षीच्या मानाने कमीच आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)