शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काश्मिरात मारले गेलेले दहशतवादी विदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:44 IST

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.‘या दहशतवाद्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे व अन्य साहित्यावरून ते विदेशी नागरिक आणि लष्कर- ए- तोयबाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत शहीद झालेल्या दोन कमांडर्सना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.तथापि, हे पाचही दहशतवादी नुकतेच भारतात घुसले होते की, आधीपासूनच मुक्कामाला होते किंवा ते एखाद्या नव्या दहशतवादी गटाचे सदस्य होते काय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे दुआ म्हणाले. या भागात आणखी किती दहशतवादी दडून बसलेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. जैश- ए- मोहंमदचा या भागात फारसा प्रभाव असेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुपवाडाच्या झोनरेशी गावात शुक्रवारी सुरू झालेली चकमक शनिवारी संपली होती, ज्यात हे पाच दहशतवादी ठार आणि दोन जवान शहीद झाले होते.घुसखोरीत घट झाल्याचा दावामागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी काश्मिरात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविणाऱ्या ठिकाणी शंभरपेक्षाही कमी दहशतवादी आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केला.२०१५ मध्ये घुसखोरीच्या ६०० पेक्षा जास्त घटना घडल्या होत्या. आता त्यात घट झाली आहे. आता शंभरेक दहशतवादी सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत असू शकतात; पण ही संख्या गतवर्षीच्या मानाने कमीच आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)