शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दहशतवाद खपवून घेणार नाही -गृहमंत्री

By admin | Updated: December 13, 2015 22:42 IST

रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.

नवी दिल्ली : रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.भारताला सुरक्षित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते एका संदेशात म्हणाले. १४ वर्षांपूर्वी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही. शूर सुरक्षा जवानांनी दाखविलेल्या धैर्याला मी सलाम करतो, असे त्यांनी नमूद केले. पाच बंदूकधाऱ्यांनी संसदेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दिल्लीचे पाच पोलीस, सीआरपीएफची एक महिला पोलीस अधिकारी, संसदेतील दोन रक्षक आणि एक माळी असे नऊ जण शहीद झाले. > मोदींच्या उपस्थितीत संसदेत आदरांजली...लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला, राज्यसभेचे सभापती पी.जे. कुरियन, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सत्यनारायण जतिया आदी त्यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदींनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांनी रविवारी संसद परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली अर्पण केली.