शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

दहशतवाद, दवेष कधीही यशस्वी होऊ शकणार नाही - राहुल गांधी

By admin | Updated: October 4, 2016 03:52 IST

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्कराच्या छावणीवरील दहशतवादी हल्ल्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्कराच्या छावणीवरील दहशतवादी हल्ल्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी तीव्र शब्दांत निर्भत्सना केली. आमच्या सैनिकांचे शौर्य आणि निश्चयापुढे दहशतवाद, तसेच द्वेष कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘बारामुल्ला येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. आमच्या शूर सैनिकांचे साहस आणि निश्चयापुढे दहशतवाद आणि द्वेष यांचा कधीही निभाव लागू शकणार नाही. बारामुल्लात लष्कर आणि निमलष्करी बीएसएफच्या लगत छावण्या आहेत.

या छावण्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद, तर एक जखमी झाला. सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवर हल्ला केला. त्यानंतर, सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत तुफान धुमश्चक्री झाली. जवान आमच्या देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सदैव प्रार्थना करतो. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदाला सलाम! असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.