शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

काश्मीरमध्ये तणाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 01:02 IST

सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी

श्रीनगर/नवी दिल्ली : सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यामुळे खोऱ्यात पसरलेला तणाव पाहता काही जिल्ह्णांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला.मंगळवारच्या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी दु्रगमुल्ला येथे हजारो लोकांनी निदर्शने केली. यावेळी सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी उडालेल्या संघर्षात जहाँगीर अहमद वाणी हा युवक नळकांडी डोक्यावर फुटल्यामुळे जागीच ठार झाला. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी कुपवाडाच्या हंदवाडा येथे कथित विनयभंगाच्या घटनेनंतर निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक ठार तर पाच जण जखमी झाले होते. जखमींपैकी एका ५५ वर्षीय महिलेचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने श्रीनगर व कुपवाडा जमावबंदी लागू करण्यात आली.