शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

काश्मीरमध्ये तणाव, संचारबंदी कायम

By admin | Updated: September 6, 2016 04:08 IST

हिंसक जमावला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केल्यामुळे खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

श्रीनगर : काश्मीरचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये आलेले असताना रविवारीही हिंसक जमावला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केल्यामुळे खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने काल केलेल्या कारवाईमध्ये २00 हून अधिक जण जखमी झाले असून, त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात पुन्हा एकवार तणाव निर्माण झाला आहे.श्रीनगर शहराच्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी असून, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आधीपासूनच संचारबंदी होती. कालच्या घटनेनंतर बटामालू आणि मैसुमा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही संचारबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या परिस्थिती शांत असली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)सर्व व्यवसाय बंदशहराच्या सर्व संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस ठेवले आहेत. सलग ५९ व्या दिवशीही खोऱ्यातील आणि श्रीनगरमधील लोकांवर निर्बध कायम आहेत. सर्व दुकाने, कार्यालये, पेट्रोल पंप आणि अन्य लहान-मोठे व्यवसाय बंद असून, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालये आणि सर्व बँका काही प्रमाणात सुरू झाल्या असून, तेथील उपस्थितीमध्येही वाढ झाल्याचा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. रस्त्यांवरील वाहतूक मात्र पूर्णपणे बंद आहे.