शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार घोटाळ्याचा मोदी सरकारला फास?

By admin | Updated: July 8, 2016 04:25 IST

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे.

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, आयडिया, टाटा आणि एअरसेल कंपन्यांनी चार वर्षांत ४६,०४५.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमी दाखवून सरकारला कोट्यवधीची टोपी घातली आहे; तरीही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. कंट्रोलर अ‍ॅण्ड आॅडिटर जनरल(सीएजी) यांच्या अहवालात हा खुलासा झाला की सरकारला या कंपन्यांकडून जवळपास १३ हजार ४८८ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. परंतु त्या दिशेने काही कारवाई होत असल्याचे संकेत अद्याप मिळत नाहीत. ज्या सीएजीच्या अहवालाने काँग्रेस सरकारला भ्रष्ट ठरविले त्याच सीएजीची नजर आता नरेंद्र मोदी सरकारवर आहे. गुजरात पेट्रोलियमच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची लक्तरेही सीएजी अहवालामुळेच समोर आली. आता दूरसंचारचा क्रमांक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे सरकारी तिजोरीचे जवळपास ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजले जाते.मोदी सरकारविरोधात संधीच्या शोधात असलेल्या काँग्रेसने या घोटाळ्याशी संबंधित सगळा दस्तावेज जाहीर केला आहे. तो करण्याचा उद्देश एवढाच आहे की जे मोदी सरकार प्रामाणिकपणाचे ढोल वाजवत आहे ते गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला, शक्ती सिंह गोहील आणि आर. पी. एन. सिंह यांनी क्रमाक्रमाने हा दस्तावेज जाहीर करून सरकार सरकारी तिजोरीला भगदाडे पाडून आपल्या मर्जीतील उद्योगसमूहांना फायदा मिळवून द्यायचा कसा प्रयत्न करीत आहे हे सिद्ध केले. सरकारी तिजोरीचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी सरकारची कोणती योजना आहे अशी विचारणा काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.वसुली का थांबवली?- मोदी सरकार मोजक्या कंपन्यांशी हातमिळवणी करून सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यास हातभार तर लावत नाही ना? असे जर नाही तर सीएजीने सांगितल्यानंतरही मोठ्या प्रमाणावरील वसुली थांबविली का जात आहे?- सरकार या कंपन्यांकडून पैसा वसूल का करू इच्छित नाही? काँग्रेसने मोदी सरकार हे मुद्दामच करीत आहे; कारण कायदा दुबळा व्हावा आणि या कंपन्यांना या प्रकरणातून सुटण्यासाठी रस्ता मिळावा, असा आरोप केला आहे.