शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

टेलिकॉम इंडस्ट्रीत 1 लाख नोक-यांवर येणार कु-हाड

By admin | Updated: February 15, 2017 15:19 IST

टेलिकॉम इंडस्ट्रीत आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोक-यांवर कु-हाड पडणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - टेलिकॉम इंडस्ट्रीत आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोक-यांवर कु-हाड पडणार आहे. दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम सेक्टर प्रभावित होऊन अनेकांवर नोक-या गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. एका कंपनीच्या एचआर हेडच्या मते, या एकत्रीकरणामुळे हेड ऑफिस आणि सर्कल(ऑफिस)मध्ये काम करणा-या अधिका-यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम आहे. जवळपास 10 हजार ते 25 हजार नोकर कपात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, त्यांची संख्या 1 लाखांच्याही घरात जाऊ शकते, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर जवळपास 3 लाखांहून अधिक लोक अवलंबून आहेत. मात्र कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे एक तृतीयांश लोकांना स्वतःची नोकरी गमावावी लागणार आहे. 2017 या वर्षात आयडिया आणि व्होडाफोननं एकत्रीकरण केलं आहे. तसेच एअरसेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन(आर कॉम)ही विलीनीकरण केलं आहे.

दरम्यान, काही पैसे जमवण्यासाठी मी माझ्या मुलासोबत जाणारा विदेश दौरा रद्द केला आहे, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. एका रिपोर्टनुसार, आयडिया, व्होडाफोन, आर कॉम आणि एअरसेलमध्ये जवळपास 48 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एकत्रीकरणामुळे कंपनीचे सर्कल प्रमुख, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक टीम प्रभावित होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचा महसूल 4 ते 4.5 टक्के कर्मचा-यांवर खर्च होतो. मात्र त्याचा खरा प्रभाव सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर पडणार आहे. मोठ्या कंपन्यांचा 22 टक्के खर्च हा सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर होतो, असं एका एचआरनं सांगितलं आहे.