शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

रेल्वे फाटकांवरील अपघात टाळणार ‘इस्रो’चे तंत्रज्ञान

By admin | Updated: June 26, 2017 01:16 IST

पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात टाळण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) विकसित केलेले तंत्रज्ञान वापरण्याचे रेल्वेने ठरविले आहे.यासाठी ‘इस्रो’ने विकसित केलेली उपग्रहावर आधारित ‘इंटेग्रेटेड सर्किट चिप’ (आयसी चिप) रेल्वेच्या इंजिनात बसविली जाईल. या चीपमुळे रेल्वेगाडी फाटकाच्या जवळ येऊ लागली की, पहारेकरी नसला तरी, फाटकापाशी बसविलेला भोंगा आपोआप वाजू लागेल. यामुळे फाटकातून रेल्वेरुळ ओलांडू पाहणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना गाडी येत असल्याची पूर्वसूचना मिळेल.रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेगाडी फाटकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असताना इंजिनातील या ‘आयसी चिप’मुळे फाटकावर भोंगा वाजू लागेल. गाडी जसजशी फाटकाच्या जवळ येईल तसा भोंग्याचा आवाज वाढत जाईल व गाडी फाटक ओलांडून पार झाली की भोंगा वाजणे बंद होईल या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, सुरुवातीस मुंबई आणि गुवाहाटी राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनांमध्ये अशा ‘आयसी चिप’ प्रायोगिक तत्त्वावर बसविल्या जातील. तसेच या गाड्यांच्या मार्गावर असलेल्या २० विनापहारेकरी  रेल्वे फाटकांवर या चिपमुळे वाजणारे भोंगेही बसविले जातील. टप्प्याटप्प्याने आणखी रेल्वेगाड्याही या तंत्रज्ञानाने सज्ज केल्या जातील.गाड्यांचा ठावठिकाणा कळेल-या चिप उपग्रहाशी संलग्न असल्याने संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा नेमका ठावठिकाणाही त्यामुळे अचूक कळू शकेल. सध्या ही माहिती मार्गावरील स्थानकांतील कर्मचाऱ्यांकडून गोळा केली जाते. नव्या तंत्रज्ञानामुळे एखादी गाडी अमूक वेळेला नेमकी कुठे आहे याची माहिती प्रवाशांना त्याच वेळी देणेही शक्य होईल. या चिपमुळे रेल्वेमार्गाच्या परिसरातील भागाचे ‘मॅपिंग’ करणेही शक्य होईल आणि अपघाताच्या वेळी गाडी नेमकी कुठे आहे व तेथील भूप्रदेश कसा आहे हेही समजू शकेल.देशभरात रेल्वेमार्गांवर पहारेकरी नसलेली सुमारे १०००० फाटके आहेत व एकूण रेल्वे अपघातांपैकी ४० टक्के अपघात अशा फाटकांवर होत असल्याने हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. यावर रेल्वे निरनिराळे उपाय शोधत असते. फाटक बंद करायचे म्हटले, तर तेथे रेल्वेमार्गावरून रस्त्याचा पूल बाधावा लागतो किंवा रेल्वेमार्गाखालून रस्ता न्यावा लागतो. हे काम खर्चिक आहे व सर्व ठिकाणी ते शक्य होतेच असेही नाही. गेल्या दोन वर्षांत अशी सुमार २४०० फाटके बंद केली गेली आहेत.