शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टीम इंडियाने राजकोट वाचवले! पहिली कसोटी अनिर्णित

By admin | Updated: November 13, 2016 17:08 IST

शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले.

ऑनलाइन लोकमत 
राजकोट, दि. 13 -  शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले. आज कसोटीच्या  शेवटच्या दिवशी  इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 310  धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  शेवटच्या सत्रामध्ये आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाल्याने भारतीय संघ पराभूत होतो की काय अशी चिन्हे दिसू लागली होती. पण विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने शेवटची दहा षटके खेळून काढत सामना वाचवला.
इंग्लंडने आपला दुसरा डाव तीन बाद 260 धावांवर घोषित करून भारतासमोर विजयासाठी 310 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर गौतम गंभीर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला. पण पुजारा (18), विजय (31) आणि रहाणे (1) हे ठराविक अंतराने बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. 
पण विराट कोहली आणि अश्विनने पाचव्या विकेटसाठी 47 धावा जोडत सामना अनिर्णिततेकडे झुकवला. पण अश्विन (32) आणि वृद्धिमान साहा (9) हे बाद झाल्याने भारतीयांची धडधड वाढली. मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा असलेला कर्णधार विराट कोहली (नाबाद 49) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 32) यांनी शेवटच्या षटकांमध्ये इंग्रजांना यश मिळू न देता सामना अनिर्णित राखला. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली होती.
तत्पूर्वी, कालच्या बिनबाद 114 धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने 260 धावा फटकावत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडकडून कर्णधार अॅलेस्टर कूकने (130) शतक तर हासिब हमीदने (82) अर्धशतक फटकावले.