शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

टीम इंडियाने राजकोट वाचवले! पहिली कसोटी अनिर्णित

By admin | Updated: November 13, 2016 17:08 IST

शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले.

ऑनलाइन लोकमत 
राजकोट, दि. 13 -  शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले. आज कसोटीच्या  शेवटच्या दिवशी  इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 310  धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  शेवटच्या सत्रामध्ये आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाल्याने भारतीय संघ पराभूत होतो की काय अशी चिन्हे दिसू लागली होती. पण विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने शेवटची दहा षटके खेळून काढत सामना वाचवला.
इंग्लंडने आपला दुसरा डाव तीन बाद 260 धावांवर घोषित करून भारतासमोर विजयासाठी 310 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर गौतम गंभीर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला. पण पुजारा (18), विजय (31) आणि रहाणे (1) हे ठराविक अंतराने बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. 
पण विराट कोहली आणि अश्विनने पाचव्या विकेटसाठी 47 धावा जोडत सामना अनिर्णिततेकडे झुकवला. पण अश्विन (32) आणि वृद्धिमान साहा (9) हे बाद झाल्याने भारतीयांची धडधड वाढली. मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा असलेला कर्णधार विराट कोहली (नाबाद 49) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 32) यांनी शेवटच्या षटकांमध्ये इंग्रजांना यश मिळू न देता सामना अनिर्णित राखला. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली होती.
तत्पूर्वी, कालच्या बिनबाद 114 धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने 260 धावा फटकावत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडकडून कर्णधार अॅलेस्टर कूकने (130) शतक तर हासिब हमीदने (82) अर्धशतक फटकावले.