शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मोदी सरकारला संघाचे प्रशस्तिपत्र

By admin | Updated: September 5, 2015 02:23 IST

सर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्रात सत्तेवर आली. अजून बराच काळ हातात आहे.

सुरेश भटेवरा,नवी दिल्लीसर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्रात सत्तेवर आली. अजून बराच काळ हातात आहे. या कालखंडात जनतेच्या अपेक्षा हे सरकार जरूर पुऱ्या करील, संघाला याची खातरी वाटते, अशी ग्वाही रा.स्व. संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी समन्वय बैठकीच्या समारोपाआधी भवनासमोरील खुल्या मैदानात रणरणत्या उन्हात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संघातर्फे मोदी सरकारला मिळालेले हे खुले प्रशस्तिपत्रच आहे. भाजपा आणि रा.स्व. संघाच्या समन्वय बैठकीचा शुक्रवारी तिसरा व अंतिम दिवस होता. वसंत कुंज येथील मध्यांचल भवनात बैठकीच्या अंतिम टप्प्यात दुपारी ४.३0 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले. बैठकीत त्यांची नेमकी भूमिका काय ? संघ कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत की नाहीत? पंतप्रधानांकडून संघाच्या नेमक्या अपेक्षा तरी काय? याबाबतची माहिती पत्रकारांना होसबळे यांनी दिली नाही.बैठकीतील चर्चेविषयी बोलताना होसबळे म्हणाले, देशभर खेड्यातून शहरांकडे ग्रामीण जनतेचे स्थलांतर व पलायन सुरू आहे. ते त्वरित थांबावे यासाठी गावागावांत कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या सोयी) उपलब्ध झाल्या पाहिजेत.देशात शिक्षणाचे व्यापक बाजारीकरण झाले आहे, त्याऐवजी त्याचे भाारतीयकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत होसबळे म्हणाले, महागड्या शिक्षण व्यवस्थेवर समन्वय बैठकीत चिंता व्यक्त झाली.ही बैठक सरकारच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नव्हती तर त्या बैठकीत आम्ही देशाच्या विकासासंबंधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.तिसऱ्या दिवशी गंगा सफाई अभियानाविषयी उमा भारतींनी सरकारी योजनेचे प्रेझेंटेशन दिले त्यात कालबद्ध योजनेचा अभाव असल्याने संघाने निराशा व्यक्त केली, अशी माहिती संघाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.१२ केंद्रीय मंत्र्यांनी संघाच्या बैठकीत जवळपास पूर्णवेळ हजेरी लावली. त्यावर विरोधी पक्षांनी गेले दोन दिवस टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले, रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाने रा.स्व. संघाला कोणतेही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. वर्षातून दोनदा होणारी संघाची बैठक वैचारिक आदानप्रदानासाठी असते.संघाची पार्श्वभूमी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यात भाग घेतला आणि सरकारची भूमिका संघ कार्यकर्त्यांना समजावून सांगितली, त्यांच्या शंकांना उत्तरे दिली तर त्यात काय बिघडले? या बैठकीद्वारे मोदी सरकारला संघाने कोणताही अजेंडा दिलेला नाही.राम जन्मभूमीवर मंदिर उभारायला हवे, मात्र हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत मी आत्ताच काहीही बोलू शकत नाही. - दत्तात्रय होसबळे, सह-सरकार्यवाह, रा.स्व. संघ