शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना शिकवा, गरीबी हटवा - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: September 18, 2015 11:58 IST

कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल

ऑनलाइन लोकमत

वाराणसी, दि. १८ - गरीबी हटावचे नारे दिले गेले परंतु प्रत्यक्षात गरीबीचं निर्मूलन करण्यात आपण अपयशी ठरल्याचं सांगताना आता गरीबीविरुद्ध युद्ध पुकारण्याची गरज असून त्यासाठी मुलांचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल असं सांगत एकवेळ माझ्याप्रती नाराजी व्यक्त करा परंतु मुलांना शिकवाच असं कळकळीचं आवाहन मोदींनी वाराणसी येथे केले.

रिक्षा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रदानांच्या हस्ते १०१ ई-रिक्षा व ५०१ सायकल रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या ६०२ रिक्षा अशांना देण्यात आल्या ज्यांच्याकडे यापूर्वी स्वत;ची रिक्षा नव्हती. दुस-याची रिक्षा भाड्याने घेऊन ते रिक्षा चालवत आणि कमाईतला मोठा हिस्सा भाड्यापोटी जात असे. विविध बँकांच्या व अन्य संस्थांच्या सहाय्याने कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देऊन या रिक्षाचालकांना रिक्षा देण्यात आल्या असून एखाद-दोन वर्षात ते या रिक्षांचे मालक बनतिल असे मोदी म्हणाले.

जे काम पन्नास वर्षात झाले नाही ते गरीबांंच्या बँक खात्यांचे काम मी वर्षभरात केले असे सांगताना आज १८ कोटी गरीबांनी जनधन योजनेत खाते उघडल्याचे मोदी म्हणाले. काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या भारतीयांकडे आता बँक खाते असल्याचे सांगणा-या नरेंद्र मोदींनी या गरीबांनी ३० हजार कोटी रुपये बँकांमध्ये ठेवल्याचेही सांगितले.

दारीद्र्य निर्मूलनाचे जे  काम आपले विरोधक ५० वर्षात करू शकले नाहीत ते मी ५० महिन्यात करून दाखवेन असा दावाही यावेळी मोदींनी केला.