शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मुलांना शिकवा, गरीबी हटवा - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: September 18, 2015 11:58 IST

कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल

ऑनलाइन लोकमत

वाराणसी, दि. १८ - गरीबी हटावचे नारे दिले गेले परंतु प्रत्यक्षात गरीबीचं निर्मूलन करण्यात आपण अपयशी ठरल्याचं सांगताना आता गरीबीविरुद्ध युद्ध पुकारण्याची गरज असून त्यासाठी मुलांचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल असं सांगत एकवेळ माझ्याप्रती नाराजी व्यक्त करा परंतु मुलांना शिकवाच असं कळकळीचं आवाहन मोदींनी वाराणसी येथे केले.

रिक्षा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रदानांच्या हस्ते १०१ ई-रिक्षा व ५०१ सायकल रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या ६०२ रिक्षा अशांना देण्यात आल्या ज्यांच्याकडे यापूर्वी स्वत;ची रिक्षा नव्हती. दुस-याची रिक्षा भाड्याने घेऊन ते रिक्षा चालवत आणि कमाईतला मोठा हिस्सा भाड्यापोटी जात असे. विविध बँकांच्या व अन्य संस्थांच्या सहाय्याने कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देऊन या रिक्षाचालकांना रिक्षा देण्यात आल्या असून एखाद-दोन वर्षात ते या रिक्षांचे मालक बनतिल असे मोदी म्हणाले.

जे काम पन्नास वर्षात झाले नाही ते गरीबांंच्या बँक खात्यांचे काम मी वर्षभरात केले असे सांगताना आज १८ कोटी गरीबांनी जनधन योजनेत खाते उघडल्याचे मोदी म्हणाले. काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या भारतीयांकडे आता बँक खाते असल्याचे सांगणा-या नरेंद्र मोदींनी या गरीबांनी ३० हजार कोटी रुपये बँकांमध्ये ठेवल्याचेही सांगितले.

दारीद्र्य निर्मूलनाचे जे  काम आपले विरोधक ५० वर्षात करू शकले नाहीत ते मी ५० महिन्यात करून दाखवेन असा दावाही यावेळी मोदींनी केला.