शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

मुलांना शिकवा, गरीबी हटवा - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: September 18, 2015 11:58 IST

कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल

ऑनलाइन लोकमत

वाराणसी, दि. १८ - गरीबी हटावचे नारे दिले गेले परंतु प्रत्यक्षात गरीबीचं निर्मूलन करण्यात आपण अपयशी ठरल्याचं सांगताना आता गरीबीविरुद्ध युद्ध पुकारण्याची गरज असून त्यासाठी मुलांचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल असं सांगत एकवेळ माझ्याप्रती नाराजी व्यक्त करा परंतु मुलांना शिकवाच असं कळकळीचं आवाहन मोदींनी वाराणसी येथे केले.

रिक्षा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रदानांच्या हस्ते १०१ ई-रिक्षा व ५०१ सायकल रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या ६०२ रिक्षा अशांना देण्यात आल्या ज्यांच्याकडे यापूर्वी स्वत;ची रिक्षा नव्हती. दुस-याची रिक्षा भाड्याने घेऊन ते रिक्षा चालवत आणि कमाईतला मोठा हिस्सा भाड्यापोटी जात असे. विविध बँकांच्या व अन्य संस्थांच्या सहाय्याने कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देऊन या रिक्षाचालकांना रिक्षा देण्यात आल्या असून एखाद-दोन वर्षात ते या रिक्षांचे मालक बनतिल असे मोदी म्हणाले.

जे काम पन्नास वर्षात झाले नाही ते गरीबांंच्या बँक खात्यांचे काम मी वर्षभरात केले असे सांगताना आज १८ कोटी गरीबांनी जनधन योजनेत खाते उघडल्याचे मोदी म्हणाले. काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या भारतीयांकडे आता बँक खाते असल्याचे सांगणा-या नरेंद्र मोदींनी या गरीबांनी ३० हजार कोटी रुपये बँकांमध्ये ठेवल्याचेही सांगितले.

दारीद्र्य निर्मूलनाचे जे  काम आपले विरोधक ५० वर्षात करू शकले नाहीत ते मी ५० महिन्यात करून दाखवेन असा दावाही यावेळी मोदींनी केला.