शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मद्यनिर्मितीऐवजी केवळ चहा उत्पादन

By admin | Updated: May 19, 2016 04:33 IST

मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत, आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे.

शिलाँग : एके काळी मद्यनिर्मितीसाठी आणि मद्यपींसाठी कुख्यात असलेल्या मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत, आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे. या गावाने मद्यनिर्मिती पूर्णपणे थांबवली असून, आता तेथे केवळ चहा उत्पादन केले जाते.मायलनगॉट असे या गावाचे नाव असून, ते राजधानी शिलाँगपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात हा ऐतिहासिक बदल घडविण्यामागे एक माजी शिक्षक आणि आताचा ग्रामप्रधान डी. एल. नाँगस्पंग यांचे डोके आहे. या गावातील २0 शेतकऱ्यांनी चहा उत्पादकांची एक सोसायटी स्थापन केली. त्यातील सहकार चळवळ राबवून गावाचे रूपांतर ‘आदर्श’ गावात केले. हे सर्व जण ५0 हेक्टर जमिनीवर दरवर्षी सेंद्रिय चहापत्तीचे वर्षाला ३ हजार किलोग्रॅम इतके उत्पन्न काढतात. आता तर ते गेल्या दोन वर्षांपासून आॅस्ट्रेलियाला चहाची निर्यात करीत आहेत.दहा १0 वर्षांपूर्वी हे गाव मद्यनिर्मिती आणि मद्यपींसाठी कुख्यात होते. स्थानिक महिला विशिष्ट प्रकारची ‘पायरसी’ नावाची दारू तयार करीत असत. आता त्याच महिला वेगवेगळ्या स्वादाच्या चहाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी त्याला ‘डरलाँग’ असे नाव दिले आहे. स्थानिक भाषेत ‘डरलाँग’चा अर्थ आहे ‘स्वप्न सत्यात उतरले.’ ४६ वर्षीय मोर्ताबान उमेसाँग ही महिला त्यापैकी एक आहे. उमेसाँग म्हणाल्या की, ‘मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत फिरत असताना आम्ही तरुण असताना मद्यपींची प्रचंड भीती वाटायची.’ गुन्हे कमी झालेचहाच्या उत्पादनाला प्रारंभी आदिवासी विकास मंत्रालयाने अर्थसाह्य केले. २00३ साली चहाची रोपे लावण्यात आली. त्यानंतर, चार वर्षांनी चहा उत्पादन सुरू झाले. नंतर येथे चहाच्या पानांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ या संस्थेचे साह्य मिळाले.या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गावाचे रूपांतर मद्यउत्पादक ते चहा उत्पादक असे झाले असून, हा फारच महत्त्वाचा बदल आहे. मद्यामुळे कुटुंबात आणि गावात होणारी भांडणे, तसेच अन्य गुन्हे यांच्या प्रमाणात या काही वर्षात मोठी घट झाली आहे.