शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यास टाटांना मोजावे लागणार १६ अब्ज डॉलर

By admin | Updated: October 29, 2016 02:48 IST

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलण्यात आले असले तरी मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाला सुमारे १६ अब्ज रुपये मोजावे

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलण्यात आले असले तरी मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाला सुमारे १६ अब्ज रुपये मोजावे लागू शकतात, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. मिस्त्री यांच्या कटुंबाकडे असलेल्या टाटा सन्सच्या समभागांची ही किंमत आहे, असे जाणकारांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांच्या कटुंबाच्या मालकीच्या शापूरजी पालनजी या कंपनीचे टाटा सन्समध्ये १८.४ टक्के समभाग आहेत. शापूरजी पालनजी ही कंपनी सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. मिस्त्री यांना चेअरमनपदावरून काढले तरी शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून ते संचालक मंडळात राहू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढलेली आहे. मिस्त्री संचालक मंडळात असताना कंपनीचा कारभार चालविणे टाटा सन्ससाठी अडचणीचे ठरणार आहे. मिस्त्री यांच्यापासून पूर्ण फारकत घेणे हा त्यावरचा उपाय आहे. तथापि, त्यासाठी मिस्त्री यांची संपूर्ण भागीदारी खरेदी करावी लागेल. मिस्त्री यांच्या कुटुंबाने ती विकायची तयारी दर्शविली पाहिजे, हेही महत्त्वाचे आहे. मिस्त्री यांनी आपले समभाग विकायची तयारी दर्शविल्यास त्याची एकूण किंमत १६ अब्ज डॉलर होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांनी पाठविलेल्या ई-मेलमधून टाटा समूहाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या समूहाचे शुद्ध मूल्य २६ अब्ज डॉलर असल्याचे दिसते. मिस्त्री यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी १८ अब्ज डॉलरवर समूहाला कर्ज आणि तोटा यापोटी पाणी सोडावे लागेल. हे खरे मानल्यास समूहाचे शुद्ध मूल्य अवघे ८ अब्ज डॉलर उरते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रतन टाटा यांच्या वापसीनंतर कंपनीची स्थिती अचानक सुधारेल असे नाही. तरीही जागतिक पातळीवर पोलादाची मागणी वाढत आहे. त्यामुळे २0१७ मध्ये कंपनीचे शुद्ध मूल्य २८ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते. समजा कंपनीचे २0 टक्के शुद्ध मूल्य बुडीत खाती गेले, मात्र त्याचवेळी कंपनीने ३0 टक्के वृद्धी नोंदविली, तर वर्षानंतर कंपनीचे शुद्ध मूल्य २३ अब्ज डॉलर होऊ शकते. अशा स्थितीत आपल्या १८.५ टक्के समभागासाठी मिस्त्री ३.७५ पट रक्कम मागू शकतात. त्याची एकूण किंमत १६ अब्ज डॉलर होईल. एवढी रक्कम मिळाल्यास हिस्सा विकणे मिस्त्रींसाठी नफ्याचा सौदा होऊ शकतो. कारण या गुंतवणुकीवर कंपनीकडून मिळणारा डिव्हिडंड नगण्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)