शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्रींचे आरोप टाटांनी फेटाळले

By admin | Updated: October 28, 2016 04:59 IST

टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा

नवी दिल्ली : टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा कोणताही हेतू नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालय हा वाद सोडविण्याचे अंतिम स्थान आहे, असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले.टाटा समूहातर्फे अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, मी वादविवादात पडू इच्छित नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते, हे आपल्याला न्यूटनने शिकविले आहे. कोणीही आरोपांची राळ उडवू नये. शहाणपणाचे दर्शन घडविणे ही काळाची गरज आहे. शहाणपण हरवते आणि त्याची जागा आक्रमकता घेते, तेव्हा दुर्दैवाने न्यायालये हाच पर्याय उरतो. टाटा यांना चेअरमनपद सोडण्याचे कोणतेही बंधन नव्हते. तरीही त्यांनी स्वत:च ते सोडले. मानद चेअरमन म्हणून हक्क असतानाही संचालक मंडळांच्या एकाही बैठकीला हजर नव्हते. आता त्यांनी पद स्वीकारले असले तरी ते हंगामी आहे. मागच्या दाराने उद्योग समूहाची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही सिंघवी यांनी केला. सायरस मिस्त्री यांना पदच्यूत करण्याच्या निर्णयाचे सिंघवी यांनी समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)त्यांनी समूहाची प्रतिमा मलीन केलीआपल्याला अधिकारच नव्हते, हा मिस्त्री यांचा दावा टाटा सन्सने निवेदनाद्वारे फेटाळला आहे. त्यात म्हटले की, कार्यकारी चेअरमन या नात्याने मिस्त्री यांना सर्व अधिकार होते. अधिकार नसल्याचा आरोप त्यांनी पदावरून हटविल्यानंतरच केला. माजी चेअरमननी (रतन टाटा) दशकभराच्या काळात घेतलेल्या निर्णयांवरही पदावरून गेल्यानंतरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा प्रकार दुर्दैवी आहे. मिस्त्री यांनी समूहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार माफीयोग्य नाही. अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जेव्हा नऊ शहाणे-सुरते स्त्री-पुरुष एका व्यक्तीबाबत अविश्वास व्यक्त करतात, तेव्हा त्यामागे काही तरी कारणमीमांसा असते, हे लक्षात घेतले पाहिजे.