शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सायरस मिस्त्रींचे आरोप टाटांनी फेटाळले

By admin | Updated: October 28, 2016 04:59 IST

टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा

नवी दिल्ली : टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा कोणताही हेतू नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालय हा वाद सोडविण्याचे अंतिम स्थान आहे, असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले.टाटा समूहातर्फे अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, मी वादविवादात पडू इच्छित नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते, हे आपल्याला न्यूटनने शिकविले आहे. कोणीही आरोपांची राळ उडवू नये. शहाणपणाचे दर्शन घडविणे ही काळाची गरज आहे. शहाणपण हरवते आणि त्याची जागा आक्रमकता घेते, तेव्हा दुर्दैवाने न्यायालये हाच पर्याय उरतो. टाटा यांना चेअरमनपद सोडण्याचे कोणतेही बंधन नव्हते. तरीही त्यांनी स्वत:च ते सोडले. मानद चेअरमन म्हणून हक्क असतानाही संचालक मंडळांच्या एकाही बैठकीला हजर नव्हते. आता त्यांनी पद स्वीकारले असले तरी ते हंगामी आहे. मागच्या दाराने उद्योग समूहाची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही सिंघवी यांनी केला. सायरस मिस्त्री यांना पदच्यूत करण्याच्या निर्णयाचे सिंघवी यांनी समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)त्यांनी समूहाची प्रतिमा मलीन केलीआपल्याला अधिकारच नव्हते, हा मिस्त्री यांचा दावा टाटा सन्सने निवेदनाद्वारे फेटाळला आहे. त्यात म्हटले की, कार्यकारी चेअरमन या नात्याने मिस्त्री यांना सर्व अधिकार होते. अधिकार नसल्याचा आरोप त्यांनी पदावरून हटविल्यानंतरच केला. माजी चेअरमननी (रतन टाटा) दशकभराच्या काळात घेतलेल्या निर्णयांवरही पदावरून गेल्यानंतरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा प्रकार दुर्दैवी आहे. मिस्त्री यांनी समूहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार माफीयोग्य नाही. अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जेव्हा नऊ शहाणे-सुरते स्त्री-पुरुष एका व्यक्तीबाबत अविश्वास व्यक्त करतात, तेव्हा त्यामागे काही तरी कारणमीमांसा असते, हे लक्षात घेतले पाहिजे.