शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तारसा...

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

तहसील कार्यालयातील घाणीला जबाबदार कोण?

तहसील कार्यालयातील घाणीला जबाबदार कोण?
मौदा येथील प्रकार : प्रशासनाचे दुर्लक्ष, स्वच्छतेचा अभाव
शुभम गिरडकर ० तारसा
औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने मौदा तालुका झपाट्याने विकसित होत आहे. प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा समजले जाणारे तहसील कार्यालय विविध समस्यांनी ग्रस्त आहे. या कार्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील घाणीला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मौदा तहसील कार्यालयाची २ मे १९८२ ला स्थापना करण्यात आली. पूर्वी एका साध्या इमारतीत असलेल्या तहसील कार्यालयाचे वाढती लोकसंख्या व कामांचा व्याप पाहता सन २०१४ ला प्रशस्त इमारत उभारण्यात आली. परंतु वर्षभरातच स्वच्छतेचे वाभाडे निघाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
तहसील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकास येथील घाणीचा प्रत्यय येतो. वरच्या माळ्यावर जाताना प्रत्येक कोपऱ्यात पान, खर्रा खाऊन थुंकल्याचे चित्र दृष्टीस पडते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
शासनाच्या गुटखा बंदी कायद्याची येथे सर्रास पायमल्ली होत असल्याचे वास्तव बघावयास मिळते. मात्र याकडे तहसील प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत अनेक पानठेले, टपऱ्या थाटल्या आहेत, याकडेही दुर्लक्षच आहे.
१ मे २०१३ रोजी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले. सदर कार्यालयही सध्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. त्यामुळे मौदा व कामठी तालुक्यातील अनेक नागरिक विविध प्रशासकीय कामासाठी तहसील कार्यालयात दाखल होतात. परिणामी कार्यालयात गर्दीचे प्रमाण अधिकच असते.