शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासाठी आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा - अमित शाह

By admin | Updated: August 9, 2014 13:19 IST

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निर्णायक मुसंडी मारून देणारे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह यांनी आता भाजपाचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं सांगताना राज्यात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सूचित केले.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निर्णायक मुसंडी मारून देणारे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह यांनी आता भाजपाचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं सांगताना राज्यात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सूचित केले. शाह यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि आपण अध्यक्ष होणं हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितले.
बिहारमधल्या राजकारणाचा उल्लेख करत नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केली. सत्तेसाठी हे नेते कुठल्याही थराला जात असल्याचा आरोप करत ज्या नितिशकुमारांनी लालूप्रसाद यादवांना टोकाचा विरोध केला तेच नितिशकुमार आज सत्तेसाठी लालूंना मांडीवर बसवत असल्याचे शाह म्हणाले. आत्तापर्यंत काँग्रेसच्या विरोधात सगळे एकत्र यायचे आता भाजपाविरोधात सगळे एकत्र येतात असे सांगत हा बदल चांगला असला तरी आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, अरूण जेटली यांच्यासह पक्षाचे दोन हजार नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदी- राजनाथ सिंह यांच्या जोडीमुळे, त्यांच्या अथक परिश्रमांमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करतानाच मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची उन्नतीच होईल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. देशातील अनेक राज्यांत अद्याप काँग्रेसची सत्ता असल्याचे सांगत आगामी निवडणुकीत आपण ही राज्ये काँग्रेसमुक्त करूया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच अद्याप अनेक भागात भाजपाचे मजबुतीकरण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
दरम्यान शाह यांच्या भाषणापूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे भाषण झाले. 'लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात जे अभूतपूर्व यश मिळाले, त्यात अमित शाह यांचा मोलाचा वाटा आहे', अशा शब्दांत त्यांनी शाह यांचे कौतुक केले. त्यांना पक्षाध्यक्ष करण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.