शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

तामिळनाडूत हिंसाचार

By admin | Updated: September 28, 2014 01:49 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तामिळनाडूच्या अनेक भागांत प्रचंड हिंसाचार उसळला.

तणाव : जयललिता समर्थकांकडून जाळपोळ
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तामिळनाडूच्या अनेक भागांत प्रचंड हिंसाचार उसळला. प्रक्षुब्ध अण्णाद्रमुक समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचार केला, तसेच जबरदस्तीने दुकाने बंद करून द्रमुक नेत्यांचे पुतळे जाळले.
न्यायालयाने जयललितांना दोषी ठरविल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांना रडू कोसळले. चेन्नई आणि मदुराईसह अनेक शहरांमध्ये द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी, त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन व अलागिरी यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर प्रचंड तणाव पसरला. जयललिता समर्थकांनी भाजपा नेते सुब्रrाण्यम स्वामी आणि द्रमुक नेत्यांच्या घरांवर तुफान दगडफेक केली. 
यावेळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक समर्थकांमध्ये हिंसक संघर्षही उडाला. वेप्पूर गावात राज्य परिवहन मंडळाची बस पेटविण्यात आली तर कुड्डालोर जिल्ह्यात 2क् बसगाडय़ांची तोडफोड करण्यात आली. तणावामुळे राज्यात बहुतांश शहरांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 
तामिळनाडूमधील हिंसक घटनांच्या पाश्र्वभूमीवर केरळ सरकारने परिस्थितीचा आढावा घेत शनिवारी केरळ-तामिळनाडू सीमेवर रेड 
अलर्ट जारी केला आहे. सीमा भागात जातीने लक्ष घालण्याचा आदेश केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला 
यांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे.
28.28 कोटी रुपयांच्या स्पिक निर्गुतवणूक प्रकरणातही विशेष न्यायालयाकडून 23 जानेवारी 2क्क्4 रोजी त्यांना निदरेष ठरविण्यात आले होते, हे विशेष.  (वृत्तसंस्था)
 
अण्णाद्रमुकला जबर हादरा
च्बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे सत्तारूढ अण्णाद्रमुकला जबर धक्का बसला आहे आणि 66 वर्षीय जयललिता यांचे 2क्16 मध्ये होणा:या विधानसभा निवडणुकीतील भवितव्यही धोक्यात आले आहे.
च्भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आलेल्या जयललिता या देशातील पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री ठरल्या आहेत आणि त्यांना विधानसभा सदस्यत्वापासून अपात्र ठरविले जाण्याची तसेच पुढच्या दहा वर्षार्पयत निवडणूक लढविण्यात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 
 
बहुतांश प्रकरणा ‘त्या’ सुटल्या आहेत निदरेष
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी यापूर्वीही डझनावर खटले लढले आहेत आणि त्यापैकी बहुतांश खटल्यांमध्ये त्या निदरेष सुटलेल्या आहेत. तान्सी जमीन सौदा घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्याकारणाने तत्कालीन राज्यपाल एम. फातिमा बीवी यांनी त्यांची मुख्यमंत्रिपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविली होती आणि त्यानंतर 21 सप्टेंबर 2क्क्1 रोजी जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर तान्सी जमीन घोटाळ्यात चेन्नई विशेष न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2क्क्1 रोजी शिक्षा सुनावली. परंतु नंतर मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना निदरेष ठरविले आणि नोव्हेंबर 2क्क्3 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश उचित ठरविला.