शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलिकट्टूसाठी एकवटलं तामिळनाडू, रेलरोको, शाळाही बंद

By admin | Updated: January 20, 2017 11:32 IST

तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'जलिकट्टू' या पारंपरिक खेळावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटलं असून त्याच सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
चेन्नइ, दि. २० - तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'जलिकट्टू' या पारंपरिक खेळावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले आहे. या खेळावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच आवाज उठवला आहे. 
तामिळनाडूत आज बंदची हाक देण्यात आली असून सर्व व्यवहार थंडावले आहेत, तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर या खेळाच्या समर्थनासाठी  द्रमुक नेते व खासदार कनिमोझी यांनी चेन्नई एगमोर रेल्वे स्टेशनवर 'रेल रोको' केला आहे. या आंदोलनालाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. तसेच अंबूर  येथील व्यापा-यांनीही दुकाने बंद ठेवत या खेळावरील बंदीचा निषेध दर्शवला आहे. 
(PHOTOS : जल्लीकट्टीवरील बंदीविरोधात हजारो लोक मरीना बीचवर)
(जलीकट्टूसाठी वटहुकूम नाहीच)
 
पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली बंदी घातली होती. मात्र मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला. त्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेून ही बंदी हटवण्याची मागणी केली होती. 
 ही बंदी उठविण्यासाठीतामिळनाडूतील स्थानिकांनी मोठे आंदोलन पुकारले असून गेल्या आठवड्याभरापासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. काहींनी कँडल मार्च काढला तर  बुधवारी चेन्नई येथील मरीना बीच, मदुराई अशा अनेक भागात आंदोलने करण्यात आली. 
 
सेलिब्रिटींनीही दर्शवला पाठिंबा
जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अभिनेता कमल हासन, क्रिकेटपटू आर.अश्विन, विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान या सर्वांनीच जलिकट्टूचं समर्थन केलं आहे.
' जलीकट्टू हा खेळ तामिळनाडूचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, अशा शब्दांत विश्वनाथन आनंदने या खेळाच्या आयोजनाला पाठिंबा दिला. मी प्राण्यांच्या हक्कांचे समर्थन करतो पण येथे तो मुद्दा नाही. परंपरा आणि उदरनिर्वाहाच्या साधनाचाही मान राखला गेला पाहिजे', असेही आनंदने नमूद केले.
तर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  
 

 

दोन दिवसांत होणार जलिकट्टू - मुख्यमंत्री पनीरसेल्वम

येत्या १-२ दिवसांत जलिकट्टूचे आयोजन करण्यात येईल, अशी आशा व्यक्त करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी नागरिकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. 

न्यायलयाने सुनावणी पुढे ढकलली

जलिकट्टू प्रकरणी देण्यात येणारा निकाल किमान एका आठवड्यापर्यंत टाळावा, ही केंद्र सरकारने केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे आठवड्याभरानंतर याप्रकरणी निर्णय सुनावण्यात येईल.