शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तामिळनाडूमधील आमदारांना दुप्पट पगारवाढ, 55 हजाराहून थेट 1.5 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:51 IST

तामिळनाडूमधील शेतकरी जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करत दुप्पट करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 19 - तामिळनाडूमधील आमदारांना घसघशीत पगारवाढ देण्यात आली आहे. आमदारांचा पगार दरमहिना 55 हजाराहून थेट 1.05 लाख एवढा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पलानिसामी यांनी बुधवारी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली. 234 आमदारांचा मासिक पगार जवळपास दुप्पट करण्यात आला आहे. यासोबतच आमदारांचा स्थानिक परिसर विकास निधीही वाढवण्यात आला असून दोन कोटींवरुन 2.5 कोटी करण्यात आला आहे. 
 
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षाच
सातवा वेतन आयोग सोडून बोला - एसटी महामंडळ
 
 
आमदारांना जवळपास 100 टक्के पगारवाढ मिळाली आहे. सोबतच आमदारांची मासिक पेन्शन 20 हजार रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 12 हजार रुपये होती. एकीकडे तामिळनाडूमधील शेतकरी जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना येथे आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करत दुप्पट करण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी पगारवाढीचा निर्णय जाहीर करताच सर्व आमदारांनी आनंद व्यक्त केला. मात्र डीएमके आमदारांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष तसंच आनंद व्यक्त करण्यासापासून स्वत:ला रोखलं. "प्रत्येक आमदार आतून आनंदी असेल, पण पक्षाने घातलेल्या अटींमुळे आपला आनंद व्यक्त करु शकत नसतील", असं पी धनपाल बोलले आहेत.
राज्यसभेत खासदारांच्या पगारवाढीची मागणी
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी खासदारांची पगार वाढ करण्याचा मुद्दा उचलला. खासदारांचा पगारही सातव्या वेतन आयोगाशी जोडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सातव्या आयोगाचा उल्लेख करताना आमचा पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षाही कमी असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
 
कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनीही नरेश अग्रवाल यांचं समर्थन केलं. भारतातील खासदारांना जितकं अपमानित केलं जातं तितकं कुठेच केलं जात नाही. कारण खासदार स्वतःच त्यांचा पगार वाढवतात असं येथील लोकं म्हणतात. 
 
आज राज्यसभेत बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी थेट मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. आमचे पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षा कमी असून आम्हाला मानधन वाढवून दिले पाहिजे अशी मागणी अग्रवाल यांनी केली.
 
खासदारांच्या पगारवाढीच्या मागणीवर केंद्र सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेऐवजी पगारवाढीच्या मागणीला प्राधान्य देणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.