शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

तामिळनाडूमधील आमदारांना दुप्पट पगारवाढ, 55 हजाराहून थेट 1.5 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:51 IST

तामिळनाडूमधील शेतकरी जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करत दुप्पट करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 19 - तामिळनाडूमधील आमदारांना घसघशीत पगारवाढ देण्यात आली आहे. आमदारांचा पगार दरमहिना 55 हजाराहून थेट 1.05 लाख एवढा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पलानिसामी यांनी बुधवारी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली. 234 आमदारांचा मासिक पगार जवळपास दुप्पट करण्यात आला आहे. यासोबतच आमदारांचा स्थानिक परिसर विकास निधीही वाढवण्यात आला असून दोन कोटींवरुन 2.5 कोटी करण्यात आला आहे. 
 
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षाच
सातवा वेतन आयोग सोडून बोला - एसटी महामंडळ
 
 
आमदारांना जवळपास 100 टक्के पगारवाढ मिळाली आहे. सोबतच आमदारांची मासिक पेन्शन 20 हजार रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 12 हजार रुपये होती. एकीकडे तामिळनाडूमधील शेतकरी जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना येथे आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करत दुप्पट करण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी पगारवाढीचा निर्णय जाहीर करताच सर्व आमदारांनी आनंद व्यक्त केला. मात्र डीएमके आमदारांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष तसंच आनंद व्यक्त करण्यासापासून स्वत:ला रोखलं. "प्रत्येक आमदार आतून आनंदी असेल, पण पक्षाने घातलेल्या अटींमुळे आपला आनंद व्यक्त करु शकत नसतील", असं पी धनपाल बोलले आहेत.
राज्यसभेत खासदारांच्या पगारवाढीची मागणी
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी खासदारांची पगार वाढ करण्याचा मुद्दा उचलला. खासदारांचा पगारही सातव्या वेतन आयोगाशी जोडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सातव्या आयोगाचा उल्लेख करताना आमचा पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षाही कमी असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
 
कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनीही नरेश अग्रवाल यांचं समर्थन केलं. भारतातील खासदारांना जितकं अपमानित केलं जातं तितकं कुठेच केलं जात नाही. कारण खासदार स्वतःच त्यांचा पगार वाढवतात असं येथील लोकं म्हणतात. 
 
आज राज्यसभेत बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी थेट मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. आमचे पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षा कमी असून आम्हाला मानधन वाढवून दिले पाहिजे अशी मागणी अग्रवाल यांनी केली.
 
खासदारांच्या पगारवाढीच्या मागणीवर केंद्र सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेऐवजी पगारवाढीच्या मागणीला प्राधान्य देणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.