शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तामिळनाडू सरकार आले अल्पमतात; दिनकरन यांचे बंड, २२ आमदारांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:40 IST

अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून २४ तासांच्या आत त्या पक्षाचे तामिळनाडूमधील सरकार अल्पमतात आले आहे.

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून २४ तासांच्या आत त्या पक्षाचे तामिळनाडूमधील सरकार अल्पमतात आले आहे. सहचिटणीसपदावरून काढण्यात आलेले दिनकरन यांनी बंडाचा झेंडा उभारला असून, त्यांच्यामागे तब्बल २२ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.दिनकरन यांना आणखी १0 आमदार पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. दिनकरन यांनी १९ आमदारांना पुडुच्चेरीमधील रिसॉर्टमध्ये पाठविले आहे. आमदार फुटू नयेत, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.सरकार अल्पमतात आले असले तरी त्याविरोधात अविश्वास ठराव आणणे द्रमुकला शक्य होणार नाही, कारण दोन अविश्वास ठरावांमध्ये किमान ६ महिन्यांचे अंतर असावे लागते. आधीचा ठराव एप्रिलमध्ये आणण्यात आला होता. तो फेटाळला गेला. परिणामी, आॅक्टोबरपर्यंत पुन्हा ठराव येऊ शकणार नाही.बहुमत सिद्ध करण्याची मागणी...तामिळनाडू विधानसभेतील २३३ सदस्यांपैकी अण्णा द्रमुककडे १३३ आमदार होते. त्यातील २२ आमदार दिनकरन यांना जाऊ न मिळाल्याने, पक्षाकडे केवळ १११ आमदार राहिले आहेत. बहुमतासाठी ११७ आमदार असणे गरजेचे आहे.बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी द्रमुकचे नेते स्टॅलिन यांनी केली आहे. अण्णा द्रमुकचे दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी भाजपा व केंद्र सरकारने प्रयत्न केले़ राज्यपाल विद्यासागर राव काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.