शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

तामिळनाडूत 'अम्मा राज' येणार

By admin | Updated: May 19, 2016 12:25 IST

अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १९ - अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. द्रमुक-काँग्रेस आघाडीने २०११ च्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली असली तरी, ते सत्तेपासून दूर राहतील असेच चित्र आहे. 
 
जयललिता सरकारने जनतेसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांना मतदारांनी मतपेटीतून  साथ दिली आहे. १९९१ पासून तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांमध्ये सत्तापालट होत राहिला आहे. पण यावेळी प्रथमच जयललिता सत्ता कायम टिकवतील असे दिसत आहे. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
जयललिता यांना खराब प्रकृतीमुळे यावेळी फारसा प्रचार करता आला नव्हता तसेच नोव्हेंबरच्या अखेरीस मुसळधार पावासामुळे तामिळनाडूत अनेक भागात पूर आला होता. त्यावेळी जनतेला पुरेशी सरकारी मदत मिळाली नसल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. या दोन मुद्यांचा जयललिता यांना फटका बसेल अशी शक्यता होती. 
 
 
मात्र मतमोजणीच्या आकडेवारीवरुन जयललिता मुख्यमंत्रीपद कायम टिकवतील असे दिसत आहे. विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार अण्णाद्रमुकचे १६०, डीएमकेचे २३, काँग्रेसचे पाच, पीएमके दोन आणि डाव्यांचे १८ आमदार आहेत. भाजपने पक्ष विस्तारावर इथे लक्ष केंद्रीत केले होते. पण त्या तुलनेत यश मिळताना दिसत नाहीय. 
 
दोनवर्षांपूर्वी लोकसभा निवडणूकीत जयललिता यांनी क्लीनस्वीप विजयाची नोंद केली होती. त्यावेळी लोकसभेच्या ३९ जागांपैकी जयललिता यांच्या पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या.जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे.