शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

लमाण्यांविषयीच्या वादाने गोव्यात अस्वस्थता

By admin | Updated: April 16, 2017 02:34 IST

गोव्याच्या किनारपट्टी भागात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लमाणी जमातीमधील लोकांना हाकलून लावायला हवे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही

- सद्गुरु पाटील, पणजी

गोव्याच्या किनारपट्टी भागात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लमाणी जमातीमधील लोकांना हाकलून लावायला हवे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही घटकांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात त्यामुळे मोठी अस्वस्थता भरून राहिली आहे.किनाऱ्यांवर फिरून पर्यटकांना छोट्या वस्तूंची विक्री करण्याचे काम लमाणी करतात. गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी त्यास जाहीरपणे आक्षेप घेतला व पर्यटन खात्याला आणि पोलिसांनाही याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोव्यातील लमाण्यांचे बेकायदा धंबे बंद करा व त्यांना हाकला अशा प्रकारचे विधान मंत्री आजगावकर यांनी केल्यानंतर लमाणी जमातीमध्ये भीती आहे. पोलिसांनी व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदा धंदा करणाऱ्या लमाण्यांना पकडण्याची व त्यांचे सामान जप्त करण्याची मोहीम सुरू केल्याने वादात भर पडली.गोवा बंजारा समाज या लमाणी जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाने सरकारवर टीका केली आहे. कुणाही व्यक्तीने बेकायदा धंदा केल्यास कारवाई करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. नायजेरीयन नागरिकांकडून अनेक बेकायदा धंदे केले जात आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारने कारवाई करावी, असे आव्हानही बंजारा समाजाने दिले. उगाच लमाण समाजाला दोषी ठरवून त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याचे बंजारा समाजाने म्हटले आहे. पर्यटन मंत्री आजगावकर यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. मंत्री आजगावकर यांनी मात्र आपण माफी मागणार नाही. बेकायदा धंद्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. किनारपट्टीतील व्यवसायामुळे पर्यटकांना उपद्रव होतो, असे आजगावकर म्हणाले.दुसरीकडे किनारपट्टीतील लमाण्यांच्या व्यवसायाविरुद्ध शासकीय यंत्रणेने कारवाई सुरूच ठेवली आहे. पर्यटन खात्याचे संचालक संजीव गांवस देसाई यांच्या मते आता किनाऱ्यांवरील लमाणी लोकांचे बेकायदा धंदे बंद झाले आहेत. समाजातील विविध घटकांच्या वाढत्या टीकेमुळे सत्ताधारी भाजपा थोडा दबावाखाली आला आहे. पक्षाचे प्रवक्ते आ. मायकल लोबो, दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन किनारपट्टीत लमाण्यांवर नव्हे तर फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे सांगितले.आम्ही लमाण्यांचा आदर करतो. सरकारच्यावतीने आम्ही माफी मागतो, असे सत्ताधारी पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी सांगितले. मी लमाणी समाजाच्या विरोधात नाही. मी देखील तळागाळातूनच संघर्ष करत आलो आहे. लमाण्यांनीही कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करावा, सरकारचा त्यास आक्षेप नसेल. किनाऱ्यांवर काहीजण दिवसभर फिरत राहतात व छोटे व्यवसाय करण्याच्या नावाखाली चरस, गांजा वगैरे विकतात. अमली पदार्थांमुळे गोव्याची युवा पिढी बरबाद होत आहे. - बाबू आजगावकर, पर्यटन मंत्री.