शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लमाण्यांविषयीच्या वादाने गोव्यात अस्वस्थता

By admin | Updated: April 16, 2017 02:34 IST

गोव्याच्या किनारपट्टी भागात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लमाणी जमातीमधील लोकांना हाकलून लावायला हवे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही

- सद्गुरु पाटील, पणजी

गोव्याच्या किनारपट्टी भागात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लमाणी जमातीमधील लोकांना हाकलून लावायला हवे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही घटकांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात त्यामुळे मोठी अस्वस्थता भरून राहिली आहे.किनाऱ्यांवर फिरून पर्यटकांना छोट्या वस्तूंची विक्री करण्याचे काम लमाणी करतात. गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी त्यास जाहीरपणे आक्षेप घेतला व पर्यटन खात्याला आणि पोलिसांनाही याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोव्यातील लमाण्यांचे बेकायदा धंबे बंद करा व त्यांना हाकला अशा प्रकारचे विधान मंत्री आजगावकर यांनी केल्यानंतर लमाणी जमातीमध्ये भीती आहे. पोलिसांनी व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदा धंदा करणाऱ्या लमाण्यांना पकडण्याची व त्यांचे सामान जप्त करण्याची मोहीम सुरू केल्याने वादात भर पडली.गोवा बंजारा समाज या लमाणी जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाने सरकारवर टीका केली आहे. कुणाही व्यक्तीने बेकायदा धंदा केल्यास कारवाई करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. नायजेरीयन नागरिकांकडून अनेक बेकायदा धंदे केले जात आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारने कारवाई करावी, असे आव्हानही बंजारा समाजाने दिले. उगाच लमाण समाजाला दोषी ठरवून त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याचे बंजारा समाजाने म्हटले आहे. पर्यटन मंत्री आजगावकर यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. मंत्री आजगावकर यांनी मात्र आपण माफी मागणार नाही. बेकायदा धंद्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. किनारपट्टीतील व्यवसायामुळे पर्यटकांना उपद्रव होतो, असे आजगावकर म्हणाले.दुसरीकडे किनारपट्टीतील लमाण्यांच्या व्यवसायाविरुद्ध शासकीय यंत्रणेने कारवाई सुरूच ठेवली आहे. पर्यटन खात्याचे संचालक संजीव गांवस देसाई यांच्या मते आता किनाऱ्यांवरील लमाणी लोकांचे बेकायदा धंदे बंद झाले आहेत. समाजातील विविध घटकांच्या वाढत्या टीकेमुळे सत्ताधारी भाजपा थोडा दबावाखाली आला आहे. पक्षाचे प्रवक्ते आ. मायकल लोबो, दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन किनारपट्टीत लमाण्यांवर नव्हे तर फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे सांगितले.आम्ही लमाण्यांचा आदर करतो. सरकारच्यावतीने आम्ही माफी मागतो, असे सत्ताधारी पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी सांगितले. मी लमाणी समाजाच्या विरोधात नाही. मी देखील तळागाळातूनच संघर्ष करत आलो आहे. लमाण्यांनीही कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करावा, सरकारचा त्यास आक्षेप नसेल. किनाऱ्यांवर काहीजण दिवसभर फिरत राहतात व छोटे व्यवसाय करण्याच्या नावाखाली चरस, गांजा वगैरे विकतात. अमली पदार्थांमुळे गोव्याची युवा पिढी बरबाद होत आहे. - बाबू आजगावकर, पर्यटन मंत्री.