शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

काश्मिरखेरीज बोलणी अशक्य - पाकची चर्चेच्या फुग्याला टाचणी

By admin | Updated: July 13, 2015 15:16 IST

काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे. सईद हाफीजच्या व्हॉइस सँपल्सच्या मुद्यावरूनही पाकिस्तानने घुमजाव केले असून २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात आणखी पुरावे हवे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांच्या हस्तांदोलनातून गरज नसताना मोठ्या आशा निर्माण केल्या गेल्याचे दिसत आहे.
पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देणार असून सार्क परीषदेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी भारतीय व पाकिस्तानी अधिकारी चर्चेची बोलणी सुरू करतिल असेही जाहीर करण्यात आले. त्याखेरीज मुंबईवरील हल्ल्याचा तपास पाकिस्तानच्या न्यायालयात गतीने करण्यात येईल असेही सांगण्यात आले. मात्र, सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार असलेले सरताझ अजिझ यांनी काश्मिर प्रश्न नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असे स्पष्ट केले आणि ही सगळी चर्चा निष्फळ होती की काय अशी शंका निर्माण केली आहे.