शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

काश्मिरखेरीज बोलणी अशक्य - पाकची चर्चेच्या फुग्याला टाचणी

By admin | Updated: July 13, 2015 15:16 IST

काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे. सईद हाफीजच्या व्हॉइस सँपल्सच्या मुद्यावरूनही पाकिस्तानने घुमजाव केले असून २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात आणखी पुरावे हवे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांच्या हस्तांदोलनातून गरज नसताना मोठ्या आशा निर्माण केल्या गेल्याचे दिसत आहे.
पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देणार असून सार्क परीषदेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी भारतीय व पाकिस्तानी अधिकारी चर्चेची बोलणी सुरू करतिल असेही जाहीर करण्यात आले. त्याखेरीज मुंबईवरील हल्ल्याचा तपास पाकिस्तानच्या न्यायालयात गतीने करण्यात येईल असेही सांगण्यात आले. मात्र, सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार असलेले सरताझ अजिझ यांनी काश्मिर प्रश्न नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असे स्पष्ट केले आणि ही सगळी चर्चा निष्फळ होती की काय अशी शंका निर्माण केली आहे.