शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

काश्मिर वगळून चर्चा अशक्य - पाकिस्तानची ठाम भूमिका

By admin | Updated: August 22, 2015 14:30 IST

काश्मिर हा भारत पाकिस्तान चर्चेसाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताझ अजिझ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - काश्मिर हा भारत पाकिस्तान चर्चेसाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताझ अजिझ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काश्मिर हाच भारत पाक चर्चेदरम्यान कळीचा मुद्दा राहिलेला आहे, त्यामुळे त्याचा समावेश उफामधल्या अजेंडामध्ये असो वा नसो त्यानं काय फरक पडतो असा प्रश्न विचारत भारत हा मुद्दा चर्चेत येऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप अजिझ यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे गेल्या अनेक भारत भेटीदरम्यान पाकिस्तानचे नेते हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करत आले आहेत, त्यामुळे आत्ताच अशा भेटींना विरोध करण्याचे काय कारण आहे असा सवालही अजिझ यांनी विचारला आहे.
जर काश्मिर हा मुद्दा चर्चेत ठेवण्याचा पाकिस्तानचा आग्रह असेल व भारताची तयारी नसेल तर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द होणार का या प्रश्नावर बोलताना, अजिझ यांनी कुठल्याही अटीविना चर्चा होणार असेल तरच भारतात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताने काश्मिर प्रश्न चर्चेत घेण्यास मान्यता दिली तरच ही चर्चा होईल अन्यथा ही भेट रद्द होईल असे संकेत अजिझ यांनी दिले आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांना त्यांच्या अटी-शर्तींवर पाकिस्तानशी चर्चा करायची आहे, त्यांना वाटतं आम्ही काश्मीरचा मुद्दा सोडून द्यावा, पण हे शक्य नाही, असेही अझिज यावेळी म्हणाले. 
दहशतवाद, मच्छिमारांची सुटका, सीमावाद असे अनेक प्रश्न भारत - पाक दरम्यान असले तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काश्मिर हाच आहे यावर अजिझ यांनी भर दिला आहे.
काश्मिरच्या जनतेला सार्वमताचा अधिकार देणे हा संयुक्त राष्ट्रात असलेला मुद्दा असून जर का हा महत्त्वाचा प्रश्न नसेल तर काश्मिरमध्ये भारताला सात लाख सैन्य का तैनात करायला लागतं असा सवालही अजिझ यांनी केला आहे.
सीनेवर भारताकडून आगळिक होते आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं असा आरोपही यावेळी पाकिस्तानने केला आहे.