शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

काश्मिर वगळून चर्चा अशक्य - पाकिस्तानची ठाम भूमिका

By admin | Updated: August 22, 2015 14:30 IST

काश्मिर हा भारत पाकिस्तान चर्चेसाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताझ अजिझ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - काश्मिर हा भारत पाकिस्तान चर्चेसाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताझ अजिझ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काश्मिर हाच भारत पाक चर्चेदरम्यान कळीचा मुद्दा राहिलेला आहे, त्यामुळे त्याचा समावेश उफामधल्या अजेंडामध्ये असो वा नसो त्यानं काय फरक पडतो असा प्रश्न विचारत भारत हा मुद्दा चर्चेत येऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप अजिझ यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे गेल्या अनेक भारत भेटीदरम्यान पाकिस्तानचे नेते हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करत आले आहेत, त्यामुळे आत्ताच अशा भेटींना विरोध करण्याचे काय कारण आहे असा सवालही अजिझ यांनी विचारला आहे.
जर काश्मिर हा मुद्दा चर्चेत ठेवण्याचा पाकिस्तानचा आग्रह असेल व भारताची तयारी नसेल तर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द होणार का या प्रश्नावर बोलताना, अजिझ यांनी कुठल्याही अटीविना चर्चा होणार असेल तरच भारतात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताने काश्मिर प्रश्न चर्चेत घेण्यास मान्यता दिली तरच ही चर्चा होईल अन्यथा ही भेट रद्द होईल असे संकेत अजिझ यांनी दिले आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांना त्यांच्या अटी-शर्तींवर पाकिस्तानशी चर्चा करायची आहे, त्यांना वाटतं आम्ही काश्मीरचा मुद्दा सोडून द्यावा, पण हे शक्य नाही, असेही अझिज यावेळी म्हणाले. 
दहशतवाद, मच्छिमारांची सुटका, सीमावाद असे अनेक प्रश्न भारत - पाक दरम्यान असले तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काश्मिर हाच आहे यावर अजिझ यांनी भर दिला आहे.
काश्मिरच्या जनतेला सार्वमताचा अधिकार देणे हा संयुक्त राष्ट्रात असलेला मुद्दा असून जर का हा महत्त्वाचा प्रश्न नसेल तर काश्मिरमध्ये भारताला सात लाख सैन्य का तैनात करायला लागतं असा सवालही अजिझ यांनी केला आहे.
सीनेवर भारताकडून आगळिक होते आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं असा आरोपही यावेळी पाकिस्तानने केला आहे.